
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात या आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने २६६ शेतकऱ्यांचे १३० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात ११९ हेक्टरवर झालेले नुकसान ३३ टक्क्यापेक्षा अधिक आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती हे स्पष्ट झाले आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे फळगळतीही बऱ्यापैकी झाली आहे. अकोल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी अवकाळी पाऊस झाला. आधीच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.
दोन दिवसांत राहुरी, नगर, पारनेर, अकोले, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट व वादळ झाले. याचा शेतीपिके, फळपिके, भाजीपाल्याला फटका बसला, कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, पारनेर तालुक्यात ४, पाथर्डीत १, श्रीगोंद्यात चार, जामखेडला १०, राहुरीत तीन, अकोल्यात एक कोपरगावात २ व राहात्यात १ अशा गावांतील २६६ शेतकऱ्यांच्या शेतपिकांना वादळ, गारपीट, पावसाचा फटका बसला.
अकोल्यात अडीच हेक्टर, कोपरगावात सव्वादोन हेक्टर, पारनेरमध्ये ६४ हेक्टर, पाथर्डीत साडेआठ हेक्टर, श्रीगोंद्यात १६ हेक्टर, जामखेडला २४ हेक्टर, राहुरीत सात हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यात कांदा, फळपिके, भाजीपाला, उन्हाळी बाजरी, मका याचा समावेश आहे.
याशिवाय अनेक भागात वादळाने फळगळती झाल्याने आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. वादळात झाड पडल्याने अकोले तालुक्यातील कळस येथे बुद्रुक परिसरात बुधवारी जोरदार वादळी वारे होते.
कोल्हार घोटी रोडला आपल्या शेतात कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांच्या अंगावर वादळ वाऱ्यामुळे झाड पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते मृत्यू झाला आहे. संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.