Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा बळीराजाला फटका, तीन जिल्ह्यात २५०० हून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Rain Hit Crop Damage : राज्याच्या विविध जिल्ह्यात ऐण हिवाळ्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावली. हातातोंडाशी आलेल्या पीकाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
Crop Damage Due to Unseasonal Rain
Crop Damage Due to Unseasonal RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत उभ्या पिकाचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे सरकारने तातडीची मदत जाहिर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून तब्बल २,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे मुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव, धुळे, सांगलीसह नाशिक जिल्ह्यात बळीराजा संकटामध्ये आला आहे. पुणे कृषी विभागाने सध्याच्या घडीला २,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. तर यात वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.

सर्वाधिक फटका जळगावमध्ये

जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर येथे अवकाळी झाल्याने केळी बागांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे केळीचे उभ्या बागा भूई सपाट झाल्या असून उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. अनेक ठिकाणी हरभऱ्याचे देखील नुकसान झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

Crop Damage Due to Unseasonal Rain
Unseasonal Rain Damage : नाशिक जिल्ह्यात पावसाने द्राक्ष मण्यांना गेले तडे

धुळ्यात शेतकरी संकंटात

वादळी पावसाचा फटका धुळ्याच्या शिरपूर तालुक्यालादेखील बसला. येथे केळी, पपई, हरभरा, गहू आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानीची पाहणी करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.

जळगावात वाऱ्यासह जोरदार पाऊस

जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावलमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचे नुकसान झाले.

नाशिकमध्ये १८० कोटीच नुकसान

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक व येवला या तीन तालुक्यातील २३ गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १७२ हेक्टरला फटका बसला आहे. तसेच येवला तालुक्यात पावसामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले असून ३ वर्षात शेतकऱ्यांचं १८० कोटीचे नुकसान झाले आहे.

Crop Damage Due to Unseasonal Rain
Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात २३ गावांमध्ये अवेळी पावसाचा फटका

सांगलीत द्राक्ष शेती संकटात

सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली असून द्राक्षबागा वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामान बदलामुळे द्राक्ष घडकुजणे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करण्यात व्यस्त झाले आहेत.

धाराशिवमध्ये किड रोगांचा प्रादुर्भाव

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका पेरण्यात आला आहे. पण अवकाळी पावसामुळे पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तुळजापूर तालुक्यातील खरबूज फळबागांवर करप्या रोग पडत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com