
Uddhav Thackeray in Ahmednagar : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस (Rain) पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदील झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुष्काळग्रस्त (drought condition) भागाची पाहणी करण्यासाठी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिर्डीनजीकच्या गावांमधील बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
उद्धव ठाकरे कोपरगावातील कातरी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. अहमदनगरमध्ये गेल्या २५ दिवसांपासून पावसाचे टिपूसही पडलेले नाही. त्यामुळे शेतातील उभी सोयाबीनची पिके करपून गेली आहेत. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याची कैफियत मांडली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत असताना तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याच्या सूचना केल्या. तसेच शासन आपल्या दारी आले तेव्हा काय दिले? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला भेटता आले नाही. तसेच निवेदन देता आले नाही, असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.