
Dhananjay Munde’s resignation : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळच्या आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर मुंडे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या राजीनामा दिला. मुंडे यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजीनामा कारवाई आधीच का झाली नाही असा प्रश्न निर्माण करत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले, "धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांकडून भूमिका मांडण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. जर फोटो आले असतील तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का झाली नाही," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, "डिसेंबरपासून बीडच्या घटनेची चर्चा सुरू आहे. आज मुंडे यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. मी त्यांच्या तब्येतीबाबत काही बोलणार नाही पण राजीनामा देण्याचं कारण नेमकं काय? नैतिक जबाबदारी की तब्येतीचं कारण? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यायला हवं." असाही सवाल ठाकरे यांनी विचारला.
तसेच पुढे ठाकरे यांनी बीडच्या घटनेतील एवढे फोटो बाहेर आल्यानंतर देखील धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असेल तर याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारने आधीच राजीनामा का घेतला नाही? मग आता राजीनामा दिला आहे, तर तो कोणत्या कारणाने दिला, हे स्पष्ट करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरे म्हणाले," संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधी सर्व फोटो अधिवेशनाच्या काळात बाहेर कसे आले? जर फोटो आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत आले असतील तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच का घेतला नाही? दोन महिन्यात सरकारने कोणतीही हालचाल का केली नाही? या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे." असं ठाकरे म्हणाले.
मागील तीन महिन्यापासून मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. तर विरोधकांकडून मागणी देखील करत होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी टोलावाटोलवीचे उत्तर देत वेळ मारून नेली, असं आरोप विरोधक करत आहेत. आज अखेर मुंडे यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थि केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील राज्य सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होत असल्याची खंत व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.