Water Scarcity : मेळघाटातील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचे चटके

Water Crisis : मेळघाटात दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरवात झाली असून आदिवासी बांधवांना आता पाच महिन्यांपर्यंत पुन्हा या गंभीर समस्येचा सामना करावा लागणार आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : मेळघाटात दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरवात झाली असून आदिवासी बांधवांना आता पाच महिन्यांपर्यंत पुन्हा या गंभीर समस्येचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन कितीही पाणीटंचाई थांबविण्याचे दावे करीत असले तरी मेळघाटातील काही गावांत पाणीपुरवठा विभागाची पोल खुलताना दिसत आहे.

चिखलदरा तालुक्यातील आहाड हे जवळपास पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. पाणीपुरवठा विभागाने येथे नवीन टाकी व पाइपलाइनचे काम मंजूर केले आहे. या विषयाला दोन वर्षे पूर्ण होत असून अजूनपर्यंत येथे काम पूर्ण न झाल्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. जुनी पाइपलाइन व टाकी जीर्ण झाली असून आता ती गावकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव सादर करा

चिखलदरा तालुक्यातील आहाड हे आदिवासीबहुल गाव असून ते खटकाली ग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे, तर अंदाजे १२५ कुटुंबसंख्या आहे. जास्त करून येथे महिला वर्गच पाणी भरतात. त्यामुळे गावातील नळयोजना बंद असल्यास ते एक किलोमीटरवर असलेल्या नाल्यातून पाणी पिण्यासाठी भरतात.

Water Scarcity
Water Scarcity : शिराळा तालुक्यातील दहा तलाव कोरडेठाक

नदीतील दूषित पाणी गावकरी पितात, त्यामुळे येथे साथरोग उत्पन्न होण्याची भीती नाकारता येत नाही. गावकरी ज्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी भरतात त्याच नाल्यात काही पुरुष मंडळी प्रातःविधी आटोपतात. असे असताना गावातील नेतेमंडळी, सचिव तसेच येथील आरोग्य कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत.

गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल व त्याचे विपरीत परिणाम काय होतील, या बाबीशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. येथील महिला वर्ग घनदाट जंगलातील नाल्यातून पाणी भरत असल्याने येथील हिंस्र पशुंचा धोका नेहमीच राहतो. काही विपरीत घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल करण्यात येत आहे.

चिखलदरा तालुक्यातील ५४ गावांत संभाव्य पाणीटंचाई आहे. पण नवीन पाणीपुरवठा योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशातच काही गावांत विजेच्या कमी दाबामुळे तेथील मोटारी काम करीत नाहीत. म्हणून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
- डी. वाय. खाटकर, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, चिखलदरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com