Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या कष्टाची त्यांना किंमत नाही ; शरद पवार

Sharad Pawar on Central Government : केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही,’’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Nashik News : ‘‘कांदा हे लहान व जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, ही भावना यत्किंचितही नाही. केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही,’’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना जर जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली.

कांदा निर्यातबंदी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोमवारी (ता.११) रोजी चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर चौफुलीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाजाचा समाचार घेतला.

Sharad Pawar
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीप्रश्नी मार्ग काढू

या वेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, डॉ. डी. एल. कराड, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिल कदम, नितीन भोसले, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, उत्तम भालेराव, माणिकराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समिती सभापती संजय जाधव, डॉ. सयाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की कांद्याची निर्यातबंदी उठलीच पाहिजे. रास्ता रोको करून लोकांना त्रास देण्याची हौस नाही. पण रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय दिल्लीतील सरकारला जाग येत नाही. सर्व एकत्र आल्याने आता केंद्र सरकारची झोप उडाली आहे.

केंद्र सरकारमध्ये जे बसले आहेत, त्यांना जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. कांदा निर्यात बंदीसह इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस किंवा साखरेचा सिरप यांच्या वापरावर बंदी तसेच बांगलादेशमधील द्राक्ष निर्यातीवर लागलेला शुल्क याबाबतही त्यांनी केंद्राचे लक्ष वेधले.

Sharad Pawar
Sharad Pawar : कांदाप्रश्‍नी शरद पवार उतरणार रस्त्यावर

‘कांदा महाग असेल तर खाऊ नका; पण शेतकऱ्याला दोन पैसे मिळू द्या’

केंद्रात मी कृषिमंत्री असताना भाजपच्या लोकांनी कांद्याचे दर वाढले म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. लोकसभेत गोंधळ घातला. या मुद्द्यावर मी त्यांना ‘‘तुमच्या दैनंदिन आहारात कांद्याला खर्च तरी किती येतो,’’ असा प्रश्‍न विचारला.

‘तुम्ही कांद्याच्या माळा घाला, नाहीतर कवड्याच्या माळा घाला, मात्र कांद्याचे भाव कमी होणार नाहीत, निर्यातबंदी होणार नाही. कांद्याला जोपर्यंत रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,’’ अशी रोखठोक भूमिका मी घेतली होती. मात्र आता दर नियंत्रित करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू आहेत. कांदा खराब होत आहे, दर कोसळल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा परवडत नसेल, महाग असेल तर खाऊ नका, मात्र शेतकऱ्याला दोन पैसे मिळू द्या,’’ असाही उच्चार पवार यांनी सभेत केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com