Delhi Farmers Protest : शेतकरी नेत्यांवर ‘एनएसए’ नाहीच

NSA Action : शेतकरी नेत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्याचा निर्णय हरियाना पोलिसांनी घेतल्यानंतर त्यावर चौफेर टीका झाली होती.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Chandigarh News : शेतकरी नेत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्याचा निर्णय हरियाना पोलिसांनी घेतल्यानंतर त्यावर चौफेर टीका झाली होती. या टीकेनंतर पोलिसांनीही एक पाऊल मागे घेत या कारवाईला ब्रेक लावला आहे.

अंबाला रेंजचे पोलिस महानिरीक्षक सिबाश कबीराज यांनी ही माहिती दिली. आंदोलक शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामध्ये अनेक खासगी आणि सरकारी मालमत्तांचे नुकसान झाले असून ३० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. समाजमाध्यमांवर देखील चिथावणीखोर पोस्ट शेअर केल्या जात असून त्या माध्यमातून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Farmers Protest
Delhi Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांचे दिल्ली चलो; सरकारचे पुन्हा चर्चेचे आवाहन

आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कर्जमाफी तसेच किमान हमी भावासाठी पुकारलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर संघ या दोन संघटना करत आहेत. याच संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची घोषणा केली होती. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत

Farmers Protest
Delhi Farmers Protest : शेतकरी संघटनांचा आज ‘काळा दिवस’

शुभकरनच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत

खानौरी सीमेवरील आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेला युवा शेतकरी शुभकरनसिंग याच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून एक कोटी रुपयांची भरपाई देऊ केली असून त्याच्या एक बहिणीला शासकीय नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली. शुभकरनसिंग हा भटिंडा येथील रहिवासी आहे. शुभकरन याच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे मान यांनी जाहीर केले.

संघटनांनी पाळला काळा दिवस

शेतकरी आणि सरकारमध्ये चार फेऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही निर्णय झालेला नाही. शेतकरी नेत्यांनी पुन्हा दिल्ली चलो मोर्चाची घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता. २३) देशभरात शेतकरी संघटनांच्या वतीने ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. सध्या सरकारने शेतकरी आंदोलकांना चर्चेच्या पाचव्या फेरीचा प्रस्ताव दिला आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com