
Nanded News : जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन वर्षापासून सांभाळून ठेवलेले सोयाबीन कमी दराने विक्री करण्याचे धासड होत नसल्याचे चित्र आहे. हमी दराने खरेदी केंद्रावरही खरेदी प्रक्रियेला गती येत नसल्याने सध्या शेतकरी खुल्या बाजारात दरवाढीची प्रतिक्षा करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुख्यपीक असलेल्या सोयाबीन पिकांचे उत्पादक शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने मागील दोन वर्षापासून सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे. परंतु यंदा दरात सुधारणा होण्याऐवजी यात सातत्याने घट होत असल्याने उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४१५० रुपये दर मिळत आहे. हा दर किमान हमी भावापेक्षज्ञ पाचशे ते सातशे रुपये कमी असल्यामुळे शेतकरी जिल्ह्यात सुरु असलेल्या शासकीय खेरदी केंद्रात सोयाबीन विक्री करण्याच्या तयारीत आहेत. परंतु त्या केंद्रावर प्रक्रिया संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात एनसीसीएफच्या माध्यमातून शासकीय व खासगी राज्यस्तरीय संस्थांकडून ४४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यात डीएमओंचे २१, व्हीसीएमएफचे पाच तर शेतकरी उत्पादक कंपनी एसएलए असलेले १८ खरेदी केंद्राचा समावेश आहे.
यात आजपर्यंत पणनच्या खरेदी केंद्रावर ५८ हजार पाचशे क्विंटल, व्हीएमएफच्या खरेदी केंद्रावर नऊ हजार ४५४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाल्याची माहिती मिळाली. तर खासगी एजन्सीकडून १८ ठिकाणी सुरु असलेल्या खरेदी केंद्रावरील माहिती मात्र मिळू शकली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.