Water Circulation : जलदगती कालव्यात आवर्तन सोडण्याचा निर्णय नाहीच

Farmer Hunger Strike : जलदगती कालव्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आवर्तनाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण रविवारी दुपारपर्यंत सुरूच होते.
Famer Hunger Strike
Famer Hunger StrikeAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : प्रशासनासाठी रविवारी (ता. ५) सुट्टीचा दिवस असल्याने सिंचन विभागाचे कार्यालय बंद असल्याने जलदगती कालव्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आवर्तनाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण रविवारी दुपारपर्यंत सुरूच होते.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी आवर्तनासाठी शुक्रवारी (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्याने या मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले.

Famer Hunger Strike
Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाली निर्णय मात्र झाला नाही. निर्णय झाला की कळवतो असे उत्तर प्रशासनाच्या वतीने मोर्चेकऱ्यांना मिळत होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्याने आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश मोर्चाचे उपोषणात रूपांतर करण्यात आले. पंडित अण्णा शिंदे, सोन्याबापू शिरसाठ, रामचंद्र पिल्दे, योगेश तारु, सचिन गायकवाड, मंदा न्हावले आदी उपोषणात सहभागी झाले.

पाण्याच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सावखेड गंगा येथील ग्रामपंचायतीने जलदगती कालव्याला तत्काळ पाण्याच्या आवर्तन न सोडल्यास १३ मे रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला. शिवाय उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ४) अनेक ठिकाणच्या महिला व पुरुष शेतकरी उपोषणकर्त्यांसह वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते.

Famer Hunger Strike
Agriculture Irrigation : कोकिसरे खांबलवाडी प्रकल्पाचे पाणी शुकनदीत

परंतु शनिवारी दिवसभरातही जलसंपदा विभागाकडून कुठलाही निर्णय आवर्तन सोडण्याविषयी झाला नाही. पाणी आहे मग सोडण्यासाठी अडचण काय, हा प्रश्न उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसह गंगापूर, वैजापूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पडला आहे.

दुष्काळी स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यातून गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे गरजेचे होते. यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी पाणी आवर्तन सोडले नाही. त्यामुळे शुक्रवारपासून हक्काचे आवर्तनाचे पाणी नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यात तत्काळ सोडण्यासाठी आधी आक्रोश मोर्चा व नंतर उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले.

वैजापूर येथील सिंचन विभाग कार्यालयसमोर हे उपोषण सुरू होते. रविवारी खासकीय कार्यालयाला सुट्टी असल्याने निर्णय लांबणीवर पडला. मागणी रास्त आणि योग्य असल्याने ती मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रविवारीही उपोषण सुरू ठेवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com