Solapur News : सोलापुरातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा चालला तळाशी

Water Shortage : जिल्ह्यावर यंदा टंचाईचे सावट लवकरच जाणवणार
Solapur
SolapurAgrowon

Ujani Dam : सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाची पाण्याची पातळी आता ५० टक्क्यांच्या आत आली आहे.

पण आता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठाही तळाशी गेल्याने अनेक गावांमध्ये यंदा लवकरच टंचाईच्या झळा जाणवणार असून, साधारण फेब्रुवारीपासून टॅंकर सुरू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात दोन, माढा व करमाळा तालुक्यात प्रत्येकी एक, असे चार टॅंकर सध्या सुरू आहेत. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण ६० टक्क्यांपर्यंत भरले. पण आता शेतीला दोन आवर्तने सोडली जाणार असून प्रत्येकी ५० दिवसांनंतर सोलापूर शहराला भीमा नदीतून एक आवर्तन सोडावे लागणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर उजनी धरण यंदा फेब्रुवारीतच उणेमध्ये जाणार आहे. त्याचा परिणाम एप्रिल ते जून या काळात सर्वच घटकांना सोसावा लागणार आहे. उजनी धऱणातील पाणीपातळी आता ४८ टक्क्यांवर आली आहे.

Solapur
Solapur News : ‘सोलापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव देणार’

एकीकडे उजनी धऱणाची ही स्थिती असताना, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यानेही चिंता वाढवली आहे. जिल्ह्यातील एकरुख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी आणि पिंपळगाव ढाळे या मध्यम प्रकल्पात एकूण पाणीसाठा २.२३ टीएमसी आहे. तर त्यापैकी उपयुक्तसाठा केवळ १.३० टीएमसी एवढा आहे. तर या पाण्याची टक्केवारी १७.९ टक्के आहे.

एकरुख ०.९३, हिंगणी ०.५५, जवळगाव ०.४१, मांगी ०.१०, आष्टी ०.०२, बोरी ०.१८, पिंपळगाव ढाळे ०.५ तर या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २.२३ टीएमसी आहे. या मध्यम प्रकल्पासाठी साठा अशा पद्धतीने अगदी तळाला गेला आहे. त्यामुळे आता तो साठा कुठपर्यंत टिकतो, हा प्रश्नच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com