Ujani Dam : राज्याच्या दोन नंबरच्या मोठ्या धरण पट्ट्यात 'दुष्काळाचं सावट'

water storage in Ujani Dam : सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या उजनी धरणात मेच्या आधीच पाणी साठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणपट्ट्यात दुष्काळाचं सावट घोंगावत आहे. त्यामुळे येथील बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पावसाने मारलेल्या दडीमुळे चार महिन्याच्या आधीच उजनी धरणाने तळ गाठल्याचे दिसत आहे. त्यामुळे धरण परिसरातल्या गावांवर आता दुष्काळाचं सावट घोंगावतंय. गेल्या वर्षी याच महिन्यात उजनी धरणात १०० टक्के पाण्याचा साठा होता. मात्र यंदा चार महिन्यांच्या आधीच उजनी धरणातील जिवंत पाण्याचा साठा संपल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यंदा पावसाने दांडी मारल्याने धरण फक्त ६० टक्केच भरले. त्यामुळे धरणात ९५ टीएमसी पाण्याची साठवण झाली होती. पण यासाठ्यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा हा मृत आहे. तर उर्वरीत साठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच जीवंत पाणीसाठा होता. मात्र तो आता संपला आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यात उजनी धरणात १०० टक्के पाण्याचा साठा होता. मात्र यंदा चार महिन्यांच्या आधीच उजनी धरणातील जीवंत पाण्याचा साठा संपल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यंदा पावसाने दांडी मारल्याने धरण फक्त ६० टक्केच भरले. त्यामुळे धरणात ९५ टीएमसी पाण्याची साठवण झाली होती. पण यासाठ्यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा हा मृत आहे. तर उर्वरीत साठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच जीवंत पाणीसाठा होता. मात्र तो आता संपला आहे.

३२ टीएमसी पाणीसाठा गेला कुठे

९५ टीएमसी पाणी साठ्यापैकी ३२ टीएमसी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा होता. मात्र कालवा, नदी, बोगदा, विविध पाणी योजना आणि सोलापूर जिल्ह्याला सोडलेल्या आवर्तनामुळे उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.

Ujani Dam
Ujani Water Stock : उन्हाळ्या आधीच उजनी कोरडं पडण्याची शक्यता ; धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठी

पाणी टंचाईचे सावट

गेल्या वर्षी पाऊसच लांबला. ज्यामुळे धरणातील पाणी साठण्यास मदत झाली आणि धरण १०० टक्के भरले. हा साठा जानेवारीतही तसाच होता. पण या वर्षा यात चांगलीच घट झाली आहे. कमी पडलेल्या पावसामुळे मुळातच धरणात पाणी साठलेले नाही. त्यातच आता जानेवारीतच पाणीसाठा संपल्याने धरणक्षेत्रात पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे.

Ujani Dam
Drought Crisis : उजनी पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट

चार महिन्यांत उजनी पाणी संपले

यंदा गतवर्षीच्या तुलनेत उजनीने चार महिने आधीच धरणातील पाणी साठा मृतसाठ्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे शेतीसह सोलापूर महानगरपालिकेला लागणाऱ्या पाण्यासाठी समस्येचा सामना करावा लागणार आहे.

फक्त पिण्यासाठीच पाणी

यावरून कालवा सल्लागार समितीने निर्णय घेताना धरणातील पाणी हे फक्त पिण्यासाठीच ठेवले जाईल. तर रब्बीच्या पिकासाठी शेवटचे आवर्तन सोडले जाणार असून त्यानंतर मार्च व मे महिन्यामध्ये नदीत पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले जाईन अशी माहिती उजनी धरणाच्या कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com