.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Akola News : तेल्हारा तालुक्यात मागील दोन महिन्यांत सतत पाऊस होत असल्याने पिकांची यंदा वाढ थांबलेली आहे. अनेक ठिकाणी सखल भागातील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचलेले राहिल्याने पिके कुजण्याचेही प्रकार घडलेले आहेत.
तेल्हारा तालुक्यात यावर्षी काही भागात जून महिन्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली होती. मात्र, पेरणीपासून पाऊस सातत्याने आल्याने शेतातील पिकांची वाढ जेमतेम एक फुटापर्यंत झाले. अतिपावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यात ५४ हजार हेक्टर खरीप क्षेत्र आहे. त्यात बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने कपाशीची लागवड केली होती.
नंतर १५ जूनपासून तालुक्यात काही गावांमध्ये पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी लगेच पेरणी सुरू केली. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, पिकाची पेरणी केली. तेव्हापासून म्हणजेच जून ते आतापर्यंत सातत्याने पाऊस झालेला आहे. झाडांवर फुलपात्या, बोंडांची धारणा झाली नाही. सोयाबीन पिकातही शेंगा लागण्याचे प्रमाण नगण्य आहे. काही भागात सोयाबीन पिवळे पडले आहे. काहींनी सोयाबीनमध्ये चार वेळा किटकनाशक फवारणी करुनही फळधारणा झालेली नाही. तालुक्यात ५० टक्के शेती पावसामुळे अतितण झाल्याने पडीक पडलेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.