
Rice Farming : रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील (Kharif Season) भातकापणीनंतर सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्यांचे पीक (vegetable crop) घेत आहेत. दोन-तीन वर्षांपासून या दुबार पिकाला हवामान बदलाचा फटका बसू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
त्यात आता गावातील आणि रानातील डुकरे; तसेच मोकाट जनावरांचाही पिकाला धोका वाढला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणासाठी शेतावर राखण करत बसावे लागत आहे.
परिसरातील वासांबे मोहोपाडा, आपटे, गुळसुंदे, चावणे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. कापणीनंतर दुबार कडधान्याचे पीक घेतात.
याशिवाय सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याच्या पिकाची लागवड करतात.
चार-पाच वर्षांपासून वादळ, अतिवृष्टी, परतीचा आणि अवकाळी पाऊस; तसेच वळवाच्या पावसाचा फटका बसत असल्याने खरीप आणि रब्बीच्या हंगामात पिकाचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी पुरतेच हतबल झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, परिसरात दाट लोकवस्ती असलेल्या गावातील डुकरे दुबार भात आणि भाजीपाला पिकांचे नुकसान करत आहे. डोंगरालगत असलेल्या शेतातही रानातील डुकरे, गुरे घुसून लोळत असतात. ही गुरे-जनावरे पीक खाऊन पायाखाली तुडवत असतात.
यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावर राखण करत बसावे लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.