River Linking Project : ‘नदीजोड’ची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता

River Project : राज्य सरकारवरील कर्जाचा भार व महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी बघता या प्रकल्पाची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
River Linking Project
River Linking Project Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : राज्य सरकारवरील कर्जाचा भार व महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी बघता या प्रकल्पाची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्य सरकारवरील कर्जाचा भार बघता या प्रकल्पास वेळेत निधी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केल्यास ९० टक्के निधीचा प्रश्न सुटणार आहे.

River Linking Project
River Linking Project : मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास नेणार : मुख्यमंत्री शिंदे

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून पूर्व व पश्चिम विदर्भात ३.७१ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सद्यःस्थितीत नागपूर विभागात १.२४ लाख व अमरावती विभागात १०.६१ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष आहे. नदीजोड प्रकल्पातून अधिक लाभ नागपूर विभागास होणार आहे.

अमरावती विभागाचा ८.३८ लाख हेक्टर अनुशेष शिल्लकच राहणार आहे. विशेष म्हणजे, या नदीजोड प्रकल्पात वाशीम जिल्हा समाविष्ट करण्यात आलेला नाही. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रीय जल आयोग, वनविभाग, पर्यावरण व आदिवासी विभाग यांची मान्यतासुद्धा टप्प्याटप्याने मिळवावी लागणार आहे.

River Linking Project
River Linking Project : नदीजोड प्रकल्पाची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता

यासाठी व बांधकामासाठी लागणारा कालावधी बघता, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्षे लागण्याची शक्यता आहे. यामुळे अंदाजित किंमत ही २.५० लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

वाशीम जिल्ह्याचा समावेश करावा

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम हे पाच जिल्हे व पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश नाही. त्यामुळे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विस्तार हा वाशीम जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी पण करावा, अशी मागणी समोर आली आहे.

दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचनक्षमता असलेले आंतरराज्य आणि पाण्याच्या वाटणीबाबत कोणताही वाद नसलेल्या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. महाराष्ट्रात गोसेखुर्द प्रकल्पाला ज्याने भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ प्राप्त होत आहे. राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
- प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com