
Sangli News : ताकारी उपसा सिंचन योजना सुरू झाल्यापासून (सन २००२) बऱ्याच लाभधारक शेतकऱ्यांकडे कोट्यवधी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. तसेच सध्या बहुतांश शेतकरी पाणीपट्टी चुकवण्याच्या हेतूने लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांकडे उसाचे गाळप करीत आहेत. त्यामुळे थकीत पाणीपट्टीच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ताकारी प्रशासनाने थकीत पाणीपट्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या ७/१२ वर बोजा म्हणून चढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. योजना सुरळीत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, मिरज या तालुक्यांना ताकारी योजनेच्या पाण्याने तारले आहे.
योजनेच्या लाभक्षेत्रातील जवळपास निम्मे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. टंचाई परिस्थितीत योजनेतून येरळा नदीसह आरफळ कालव्यातूनही पाणीपुरवठा केला होता. ताकारी योजना सुरू झाल्यानंतर बांधकाम, वितरण, मोजणी आणि वसुली ही सगळी जबाबदारी एकाच विभागावर होती. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ही जबाबदारी काटेकोर सांभाळण्यात प्रशासन काहीअंशी अपयशी ठरले.
याचा फटका लाभक्षेत्रातील ओलिताखाली आलेले क्षेत्र मोजणी करून वसुली करण्यात झाला होता. सन २००२ पासून योजना सुरू झाली आहे. मात्र त्या प्रमाणात लाभक्षेत्रात वाढ झाली नाही. स्वतंत्र ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागाकडे कर्मचारी अतिशय कमी आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे.
पाणीपट्टी वसुलीसाठी लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांनी प्रशासनाला मोठी मदत केली आहे. शेतकऱ्यांतून पाणीपट्टी चुकविण्यासाठी बाहेरील कारखान्यांना ऊस गाळप केला जात आहे. रोखीने पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.