Chhatrapati Sambhajinagar News : शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे. तसेच पंचनामापासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी बुद्रूक, साखरवेल शिवारात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (ता. 19)अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागात कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून शेतकऱ्यांना धीर देत आहेत.
श्री. सत्तार म्हणाले, की राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक डॉ. मनोज राठोड, राजेंद्र ठोंबरे, पुंडलिक काजे, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार श्री. राजपूत उपस्थिती होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.