
Raigad News : कडक उन्हाळा सुरू असतानाच अचानक हवामान बदलले असून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले असून फळगळती होऊन आंबा काळा पडला आहे. प्राथमिक पाहणीत, जिल्ह्यात आंबा बागायतदारांचे ३० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळामुळे मासेमारी नौकाही बंदरात नांगरून ठेवाव्या लागल्याने मच्छीमारांचेही नुकसान होत आहे.
हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील तंत्र विस्तार अधिकारी सीमा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील १६१ हेक्टरमधील ३१२ शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील ३.६२ हेक्टरमधील १७ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज नजर पाहणीत व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त तालुक्याचा अहवाल शनिवार सायंकाळपर्यंत आला नसला तरी जवळपास ३० टक्के आंब्याचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.