
Alibaug News : ऐतिहासिक मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पोहोचणे पर्यटकांना सोपे व्हावे यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत राज्यभरातून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला पाहता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून १११ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे.
समुद्रात असलेला जंजिरा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात; मात्र या वेळी अनेकांना किल्ल्यावर पोहोचणे अवघड बनते. मुळात किल्ल्यावर शिडाच्या बोटीने पोहोचावे लागते आणि त्यात किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टी नसल्याने बोटीतून किल्ल्याच्या पायऱ्यांवर उतरणे अनेकांना अशक्य होते.
लाटा आणि वारा यामुळे बोट हेलकावे खात असते. अशा वेळी लहान मुले, वृद्ध यांना बोटीतून उतरताना कसरत करावी लागते. या वेळी अपघातही होतात. या पार्श्वभूमीवर किल्ल्याजवळ जेट्टी बांधावी, अशी मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती.
अखेर ही मागणी मान्य करत सागरी मंडळाने किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सागरमाला योजनेअंतर्गत ही जेट्टी उभारण्याचे निश्चित करून यासाठी पुरातत्व विभागाची मंजुरी सागरी मंडळाने घेतली. दोन वर्षांपूर्वी १११ कोटींच्या या कामासाठी निविदा जारी करत जेट्टीचे काम सुरू करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.