Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (ता. ७) सायकांळी पावसाचा शिडकावा झाला. जिल्ह्यात दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदार हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यात रविवारी पहाटे आणखी भर पडली. पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पावसाळी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली होती.
वैभववाडी, फोंडा परिसरातील काही गावांमध्ये हलका पाऊसदेखील झाला. परंतु त्यानंतर वातावरण जैसे थे राहीले. सायकांळी पावसाळी वातावरण अधिकच गडद झाले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात हेच वातावरण होते. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
या वातावरणाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील आंबा, काजू पिकावर जाणवणार आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूला मोहर आणि फळधारणेची प्रकिया सुरू आहे. या वातावरणामुळे या पिकांवर तुडतुडे, थ्रिप्स, टी मॉस्किटो आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतचे वातावरण आंबा, काजू पिकांसाठी प्रतिकूल राहिले असल्यामुळे कीड-रोगांवर नियत्रंण मिळविण्याचा प्रयत्न बागायतदार करीत होते त्यातच वातावरणात पुन्हा बदल झाल्यामुळे आंबा, काजू पीक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.