Armyworm Infestation : शिरोळमध्ये लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन धोक्यात

Soybean Crop Issue : चांगल्या पावसामुळे तरारलेल्या सोयाबीन पिकावर पाने कुरतडणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक धोक्यात आले आहे.
Armyworm Infestation
Armyworm InfestationAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : चांगल्या पावसामुळे तरारलेल्या सोयाबीन पिकावर पाने कुरतडणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक धोक्यात आले आहे. शिरोळ तालुक्यात महापुराच्या परिस्थितीमुळे नदीकाठचा सोयाबीन कुजला आहे. माळरानावरील सोयाबीन पिकाला किडीने घेरले आहे. ढगाळ वातावरण, ऊन-पावसाचा खेळ यामुळे या किडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.

लष्करी अळीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. तालुक्यात यावर्षी वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या वेळेवर पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपत्या घेतल्या आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, मका यासह अन्य पिके सध्या जोमात आहेत. तालुक्याच्या नदी काठावरील पिकांना पुराचा फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. पूरस्थिती उतरल्यानंतर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे महसूल विभागामार्फत केले जाणार आहेत.

Armyworm Infestation
Armyworm Infestation : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

यानंतर भरपाईचा निर्णय शासन पातळीवर होणार आहे. नदीकडेची पिके वगळली तर अन्य भागातील पिकांना चांगल्या पावसाने साथ दिली आहे. माळरानावरील पिके या पावसात जोमाने वाढली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या उरकण्यात आल्या होत्या. यानंतर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी पिकांना संजीवनी मिळाली.

मात्र आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेला अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगराई वाढत आहे. सोयाबीन पिकावर पाणी कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात महापुरामुळे पिकांचे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर दुसऱ्या बाजूला रोगराईमुळे फूलकळीच्या काळात आलेले पिके धोक्यात आली आहेत. फवारणीच्या माध्यमातून लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Armyworm Infestation
Crop Damage Issue : नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्या : प्रतापराव जाधव

नुकसानग्रस्त शेतीचेही पंचनामे करा

सध्या तालुक्यात महापुराची परिस्थिती आहे. महापूर ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केली जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निकषाप्रमाणे भरपाई मिळेल. दरम्यान नैसर्गिक संकटामुळे पुराव्यतिरिक्त इतर शेतातील सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे. शासनाने पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करताना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीचेदेखील पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.

महागड्या किटकनाशकांचाही भुर्दंड

लष्करी आळी पिकांची हिरवी पाने कुरतडत असल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान होत आहे. उत्पादन घटण्याची शक्यता यातून निर्माण झाली असून लष्करी अळीच्या प्रादुर्भावापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे.

चांगल्या पावसाने जोमात आलेले सोयाबीन पीक लष्करी अळीमुळे धोक्यात आले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.
संतोष शिंदे, सोयाबीन उत्पादक शेतकरी, जयसिंगपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com