Crop Damage : पाऊस थांबेना, डोळ्यांदेखत सोयाबीन पाण्यात

Heavy Rain : परतीचा पाऊस थांबायचे नाव घेईना झाला आहे. कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्यात गेले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Latur / Dharashiv News : परतीचा पाऊस थांबायचे नाव घेईना झाला आहे. कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्यात गेले आहे. शेंगा भिजल्याने सोयाबीन खराब झाले असून काही ठिकाणी सोयाबीन काढणी करून तरी काय फायदा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

चिखल झाल्याने सोयाबीन काढणी ठप्प झाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

यासोबत घरांची पडझड किंवा पशुधनाची हानी झाली असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करून बाधितांना मदत करावी. पुरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करावे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

Crop Damage
Paddy Crop Damage : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने भात पिकाचे नुकसान

पावसामुळे नद्या, सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी बुधवारी (ता. २३) दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

पुराचा धोका असलेल्या गावांमधे प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तेरणा आणि मांजरा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, तसेच इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या सर्व नद्यांच्या काठावरील गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.

आवश्यकता असल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरण करून त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय शोध पथके, आरोग्य पथके सज्ज ठेवावीत.

Crop Damage
Crop Damage : तेहतीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी. यामध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गाव ते जिल्हा पातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. तलावांची पाणी पातळी, सांडवा, भिंत यावर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री महाजन म्हणाले.

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर नुकसानीची व पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सर्व विभागांच्या समन्वयाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी ठाकूर यांनी सांगितले.

नदी काठावरील गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बाधित होणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे सागर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com