Water Project : खानदेशातील काही प्रकल्पांत कमी जलसाठा

Water Reservoir Update : खानदेशात मागील सात ते आठ दिवसांतील पावसाने दाणादाण उडविली. अनेक भागांतील सिंचन प्रकल्पांत जलसाठा वाढला. परंतु काही प्रकल्पांतील जलसाठा अद्याप चिंताजनक स्थितीत आहे.
Girna Dam
Girna DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मागील सात ते आठ दिवसांतील पावसाने दाणादाण उडविली. अनेक भागांतील सिंचन प्रकल्पांत जलसाठा वाढला. परंतु काही प्रकल्पांतील जलसाठा अद्याप चिंताजनक स्थितीत आहे.

खानदेशात जळगाव जिल्ह्यात रावेरातील मंगरूळ, सुकी, अभोरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर पारोळ्यातील तामसवाडी किंवा बोरी प्रकल्पदेखील १०० टक्के भरला आहे. परंतु जिल्ह्यात भोकरबारी, मन्याड, हिवरा, अग्नावती, अंजनी, तोंडापूर या लघू व मध्यम प्रकल्पांतील जलसाठा वाढलेला नाही.

Girna Dam
Water Projects : मोठ्या अकरा प्रकल्पांतील साठा १५० टीएमसीवर

तसेच वाघूर धरणातही जलसाठा ८२ टक्के एवढाच आहे. वाघूर धरण जामनेरात असून, या धरणातून जळगाव, जामनेर शहरासह उद्योगांना पाणी दिले जाते. तसेच जळगाव, भुसावळ तालुक्यातील गावांत रब्बीसही पाणी मिळते. या प्रकल्पातची साठवणक्षमता नऊ टीएमसी असून, हा प्रकल्प ८२ टक्के भरला आहे.

धुळ्यातील बुराई प्रकल्पही १०० टक्के भरला आहे. तर पांझरा, जामखेली, मालनगाव या प्रकल्पांतही जलसाठा मुबलक आहे. पण अमरावती, सोनवद या प्रकल्पांतील जलसाठा कमी आहे. शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातही जलसाठा मुबलक आहे. धुळ्यात सध्या पांझरा, अनेर या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नंदुराबारातही अनेक प्रकल्प भरले आहेत. त्यात दरा, देहली, सुसरी, चिरडे आदी लघू व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यातून विसर्गही सुरू आहे.

Girna Dam
Girna Dam Water : गिरणा धरणातील पाणीसाठा शंभरीनजीक

जळगावसाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा नदीवरील गिरणा धरण बुधवारी (ता. २८) सकाळी ९२ टक्के भरले. हे धरण १०० टक्के भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु धरणक्षेत्रात पाऊस ओसरला. धरणात पाण्याची आवक मंगळवारी (ता. २७) घटली. यामुळे धरण या आठवड्यात १०० टक्के भरेल, अशी अपेक्षा मावळली आहे. कारण पाऊस थांबला आहे.

तापी नदीत विसर्ग

तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. नदीत भुसावळनजीकच्या हतनूर धरणासह जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज, धुळ्यातील सुलवाडे, नंदुरबारातील सारंगखेंडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणातून बुधवारी (ता. २८) सकाळी १४ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात जलसाठा नियंत्रणासंबंधी विसर्ग कमी अधिक केला जातो. खानदेशात सध्या नंदुरबारमध्ये सातपुड्यातील उदय, सुसरी, गोमाई, धुळ्यात अनेर, पांझरा, जळगाव जिल्ह्यात कांग, गिरणा, तापी, सुकी, भोकरी, मोर आदी नद्यांमध्ये प्रवाही पाणी आहे. पांझरा नदीला दोन दिवसांपूर्वी मोठा पूर आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com