Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon

Fruit Crop Insurance : सांगलीतील अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला फळ पीकविमा

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मृग बहरासाठी जिल्ह्यातील २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला आहे.
Published on

Sangali News: पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मृग बहरासाठी जिल्ह्यातील २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला आहे. वास्तविक पाहता, नैसर्गिक आपत्तीच्या संकटाने नुकसान होऊनही विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर, त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते.

जिल्ह्यात मृग बहरातील पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाने प्रचार आणि प्रसिद्धी केली. जिल्ह्यातील २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेऊन १ हजार ६४६ हेक्टरवरील फळ पिकांना संरक्षण दिले आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतील सहभाग अल्प

जिल्ह्यात गतवर्षी २०२३-२४ मध्ये ६ हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ७ कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी १ हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

जिल्हा कृषी विभाग फळ पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीने फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचे पंचनामे केले जातात. त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जातो. मात्र, फळ पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही.

गेल्या तीन वर्षांपासून फळ पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. आंबिया बहरातील पीकविमा घ्यावा जिल्ह्यात यंदाच्या २०२४-२५ आंबिया बहरासाठी फळ पीकविमा भरण्याचे काम सुरू आहे. या फळ पीकविमा योजनेत आंबा, द्राक्ष, डाळिंब आणि केळी या पिकांचा समावेश आहेत.

द्राक्ष पिकाचा विमा घेण्यासाठी १५ ऑक्टोबर, केळीसाठी ३१ ऑक्टोबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर तर डाळिंबासाठी १४ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी आंबिया बहरातील पिकांचा विमा भरावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मृग बहारात फळ पीकविमा योजना दृष्टिक्षेप

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) आटपाडी ६२८ ३९१.४३ जत १५०८ ९७४.७६ कवठेमहांकाळ ४०२ १९५.१७ खानापूर १४ ९.४६ मिरज ३० १४.६४ पलूस १ ०.४ तासगाव १६० ५७.९६ वाळवा ४ १.९२ एकूण २७४७ १६४६.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com