Rabi Sowing : खानदेशात रब्बी पेरणी कमी होण्याचे संकेत

Rabi Season 2023 : खानदेशात पावसाची तूट यंदा रब्बी हंगामासाठी अडथळा ठरणार असून, पेरणीचा लक्ष्यांक यंदा पूर्ण होणार नाही, असे संकेत आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पावसाची तूट यंदा रब्बी हंगामासाठी अडथळा ठरणार असून, पेरणीचा लक्ष्यांक यंदा पूर्ण होणार नाही, असे संकेत आहेत. जळगावचा पश्‍चिम भाग आणि धुळ्याच्या पूर्व मध्य भागात पेरणी कमी होईल, असे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणातील जलसाठा ५७ टक्केच आहे. मागील चार वर्षे गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. त्याची साठवण क्षमता १८.५० टीएमसी असून, या धरणाच्या मदतीने २१ हजार हेक्टरवरील रब्बीला लाभ होतो.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांना गिरणा धरणाचा लाभ आहे. परंतु यंदा जलसाठा कमी असल्याने गिरणा पट्ट्यातील रब्बीला किती लाभ होईल हादेखील मुद्दा आहे.

Kharif Sowing
Rabi Season : कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने रब्बी हंगाम यशस्वी करावा

कालवा समितीची बैठक यासंबंधी अंतिम निर्णय घेईल. जळगाव जिल्ह्यात रावेर, पारोळा भागात १०० टक्के पाऊसमान राहीले आहे. परंतु पारोळा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यांत हलक्या व मुरमाड जमिनी आहेत.

या भागात जलसाठेदेखील लागलीच कमी होतात. यामुळे या भागात रब्बीची किती पेरणी होईल, हादेखील मुद्दा आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेरातील तापी काठी रब्बी पिकांची पेरणी होईल, अशी माहिती मिळाली.

Kharif Sowing
Rabi Season : रब्बीसाठी २८ हजार क्विंटल बियाण्यांची सांगलीत मागणी

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर भागात पाऊस कमी राहीला आहे. शहादा, तळोदा तालुक्यात तापी व गोमाई नदीकाठी रब्बी बरा राहील. परंतु नंदुरबार व नवापुरात रब्बीबाबत निराशाजनक स्थिती आहे.

धुळ्यात साक्री तालुक्यातील काही भाग व शिरपूर वगळता इतरत्र रब्बीबाबत स्थिती बिकट असणार आहे. कांदा लागवडीवरही धुळ्यात कमी पावसाने परिणाम झाला आहे. धुळ्यातील मालनगाव, अमरावती, बुराई, सोनवद या प्रकल्पांत ठणठणाट आहे. फक्त पांझरा व अनेर प्रकल्पाच्या क्षेत्रात रब्बी हंगामाला पाणी उपलब्ध होईल, असे दिसत आहे.

अपेक्षित पेरणी क्षेत्र

जळगाव जिल्ह्यात रब्बीची दीड ते दोन लाख हेक्टरवर, धुळ्यात ५५ ते ६० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे ४० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित असते. जळगाव जिल्ह्यात मागील तीन वर्षे रब्बीची १५० टक्क्यांवर पेरणी झाली आहे. धुळे व नंदुरबारातही पेरणी ११० टक्क्यांवर झाली होती.

पावसाची तूट

यंदा पावसाची तूट खानदेशात दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात आठ टक्के, धुळ्यात १९ टक्के आणि नंदुरबारात २१ टक्के एवढी पावसाची तूट आहे. जळगाव जिल्ह्याचे एकूण पाऊसमान ७७५ मिलिमीटर, धुळ्याचे ५७५ मिलिमीटर आणि नंदुरबारचे ८६० मिलिमीटर एवढे पाऊसमान आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com