Sharad Pawar : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; आरक्षण, दूध दराच्या बैठकीसाठी आग्रही

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा निवडणूकीनंतर शरद पवार यांनी बारामती, इंदापूर आदी ठिकाणी मोठा दौरा पूर्ण केला.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Maharashtra Politics : मराठा व धनगर आरक्षणाबाबतचा निर्माण होणारा सामजिक तणाव कमी होणे, पुणे जिल्ह्यातील जानाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा आणि या योजनांच्या वीज बिलाच्या प्रश्न आणि खर्चाच्या तुलनेत दूधाचे दर शेतकऱ्यांना मिळवा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे वेळ मागितली आहे.

याबाबत उद्या (शुक्रवारी)संबंधित आधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी आग्रही आहे. ही लोकहिताची कामे उरकून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे.

विधानसभेत जेथे जेथे आम्ही जागा लढविणार आहेत, त्याठिकाणी जावून लोकांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती खासदार शरद पवार यांनी बारामतीत स्पष्ट केली.

बारामती लोकसभा निवडणूकीनंतर शरद पवार यांनी बारामती, इंदापूर आदी ठिकाणी मोठा दौरा पूर्ण केला. त्या पार्श्वभूमिवर आज (ता.२०) खासदार पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना दुश्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या मान्यता त्याकाळी माझ्या सहीने झाल्या आहेत. आता या योजनांची दुरूस्ती आणि विस्तारिकरण करण्याची गरज आहे.

वीज बिलांचा विषय आहे. या धोरणात्मक गोष्टी राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात. त्यावर ठोस उपायोजना करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित याबाबत महत्वापूर्ण बैठक मुंबईत होईल.

पाण्याबरोबर दुधाचा धंदा महत्वाचा आहे, असे सांगून पवार म्हणाले, "दुधाची किंमत ही खर्चाच्या तुलनेत असावी. शासनाचे पाच लिटर दूधाला अनुदान मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्याच्या बैठकीत तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे."

Sharad Pawar
Kolhapur Monsoon Tourism : पावसाळ्यात आनंद लूटा कोल्हापूरच्या 'या' ठिकाणांवर

महाराष्ट्रात भाजपचा पराभव आरएसएसने गार्भियाने घेतला आहे. परंतु सामान्य जनता महाविकास आघाडीकडे झुकली आहे. यावर पवार म्हणाले, "भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदी गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने ३१ जागा जिंकल्या.

विधानसभेच्या मतदार संघांचा विचार केला, तर १५५ मतदार संघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. २८८ जागेची विधानसभा त्यातील १५५ मतदार संघात विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे आहे.

त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार असल्याचे श्री पवार म्हणाले. छगन भुजबळ आपल्याकडे परतण्याचे संकेत दिसतात का, यावर पवार यांनी नकारार्थी भूमिका मांडली व माझी त्यांची अलिकच्या काळात भेट नसल्याचे सांगितले.

केंद्राने आरक्षणाचा मुद्या निकाली काढावा

"महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी समजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या महत्वाचा ठरत आहे. त्यामध्ये केंद्राने बघ्याची भूमिका न घेता प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्राला कायद्यात बदल करावा लागले. दोन्ही समाजाचे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन जाईल याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये समाजिक ताण निर्माण होऊ नये, याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही येथे राजकारण आणू इच्छित नाही. पण येथे केंद्राला बघ्याची भूमिका घेवून चालनार नाही."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com