Pik Vima : मोदी सरकारने खरीप हंगामातील विम्याचा दुसरा हप्ता अद्याप दिलाच नाही

Central Government : केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आला नाही. यामुळे शेतकरी विम्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.
Pik Vima
Pik Vimaagrowon

Maharashtra Kharif Crop Insurance : मागच्या वर्षी अल निनोच्या स्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. दरम्यान कमी पावसाने खरीप हंगामावार मोठा परिणाम झाला. यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली. उत्पादनात घट होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पीककापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत.

दरम्यान खरीप हंगाम गेला रब्बी हंगामाच्या कापण्या सुरू झाल्या तरी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आला नाही. यामुळे शेतकरी विम्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यातील २४ जिल्ह्यांमधील ५० लाख ९४ हजार ४६७ शेतकऱ्यांना २ हजार २०६ कोटी रुपयांची २५ टक्के अग्रिम जाहीर करण्यात आली.

उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो. या पीककापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरविण्यात येते. नुकसानभरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेली पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाते.

त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पीकविमा पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. उत्पादनाचे हे आकडे गृहीत धरून विमा कंपन्या नुकसानभरपाईचा दावा निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित नुकसानभरपाई मिळू शकते परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.

Pik Vima
Crop Insurance : पीक विमा मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे प्रकार आले उघडकीस! |Pik Vima news

दरम्यान राज्य सरकारने पहिला हप्ता २ हजार ३०० कोटी रुपये, दुसरा हप्ता म्हणून २ हजार कोटी रुपये यापूर्वीच विमा कंपन्यांना दिला आहे. परंतु केंद्र सरकारचा २ हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता अद्याप मिळू शकलेला नाही.

पीककापणी अहवालानुसार राज्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित ७५ टक्के मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उडीद, मूग व बाजरी पिकांच्या पीक कापणी अहवालातही उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com