Agriculture Scam : जतमध्ये अवकाळीच्या पंचनाम्यांत गोलमाल

Crop Damage Survey Scam : कृषी, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले असल्याचे समोर आले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : कृषी, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील वाषण आणि वज्रवाड या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या नावे द्राक्ष पीक नसतानाही त्यांना भरपाई मंजूर झाली आहे. त्यामुळे अवकाळीने बाधित झालेल्या पिकांच्या पंचनाम्यात गोलमाल उघड झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

जत तालुक्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे कृषी, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाला करण्याचे आदेश दिले.

कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचमाने करून त्याचा अहवाल करायचा असतो. त्यानुसार या तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी पंचमाने केले. त्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईही मंजूर झाली.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

दरम्यान, वाषण आणि वज्रवाड या गावांतील शेतकऱ्यांना भरपाईची माहिती मिळाली. त्यामध्ये या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे सात-बारावर द्राक्ष बागांची नोंद आणि क्षेत्रच नाही, अशा शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मुळात या दोन गावांत असा प्रकार उघडकीस आला असल्याने जत तालुक्यात आणखी किती गावांत अशा पद्धतीने बोगस पंचनामे केले असून अजून पीक नसणाऱ्या किती शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Crop Damage
Crop Damage Compensation : खरे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित

शेतकऱ्यांनी हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिला. परंतु कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे अधिकारी प्रत्यक्ष पंचनामे करताना तिथे उपस्थित होते. तर एका गावातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक व तलाठीही त्या ठिकाणी होते. मग ज्या शेतकऱ्यांच्या नावे द्राक्ष नाहीत, अशा शेतकऱ्यांना मदत कशी मंजूर होते, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कृषी, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने संगनमताने हे पंचनामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

तलाठी, ग्रामसेवकांचा काणाडोळा

वास्तविक पाहता नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे करणे अपेक्षित आहे. कृषी विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या सज्जामध्ये अवकाळीमुळे नुकसान झाले नाही, अशा सज्जामधील कृषी सहायकांना अतिरिक्त जबाबदारी दिली होती. त्यानुसार कृषी सहायक बाधित शेतीचे पंचनामे करण्यासाठी उपस्थित होते. मात्र तलाठी आणि ग्रामसेवक कोणत्याच ठिकाणी उपस्थित नव्हते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी पावसाने आमच्या पिकाचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर द्राक्ष शेती नाही अशांना भरपाई मंजूर झाली. पंचनामे बोगस केले. मग एकाला जबाबदार कसे धरायचे? यामध्ये कृषी विभाग सुद्धा सहभागी आहे.
- एक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com