
Parbhani News : परभणी तहसिल कार्यालयातर्फे आयोजित फेरफार अदालत मध्ये तालुक्यातील ८४ गावांतील ३१८ शेतकरी खातेदारांच्या ३९४ सात -बारा वरील भू विकास बँकेचा कर्जबोजा कमी करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार गणेश चव्हाण यांनी दिली.
भूविकास बॅंक मार्फत शेतकऱ्यांना शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी विहीर, कृषी पंप, कृषी अवजारे, ट्रॅक्टर आदींसाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा केले जात असे. त्यासाठी संबंधित खातेदार शेतकऱ्यांच्या सात-बारा वर कर्ज बोजा नोंदी घेतल्या जात असते.
राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील भूविकास बँकांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून या बँकांच्या कर्जदारांकडील संपूर्ण कर्ज रक्कम माफ करण्यात आली आहे.
परंतु सात बारा उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या बोजामुळे कर्ज काढणे,गहाण ठेवणे,हस्तांतर करणे,खातेफोड करणे वा शेतविक्री कामात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार चव्हाण यांनी खातेधारकांच्या सात-बारावरील कर्जबोजा कमी करण्याचे आदेश देण्याबाबत जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांना विनंती केली होती.
शेतकऱ्यांच्या सातबारावरील या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी पुढाकार घेत तहसील कार्यालयात फेरफार अदालतीचे नुकतेच आयोजन केले होते.
या अदालतीमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या साहाय्याने परभणी तालुक्यातील ८४ गावातील ३१८ शेतकरी खातेदार यांच्या ३९४ सातबारा उताऱ्यावरील कर्ज बोजाच्या नोंदी कमी केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.