
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात उसाचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) संपून, आता दोन-अडीच महिने उलटले, पण अद्यापपर्यंत २३ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिलेली नाही, या कारखान्यावर ‘आरआरसी’ची कारवाई करावी, असा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांना पाठवला आहे.
पण या कारखान्यावर कारवाई झाली नाही आणि एफआरपीही मिळाली नाही, या निषेधार्थ रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ५) सोलापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी हनुमंत गिरी, समाधान फाटे, नामदेव पवार, तनुजा जवळे, बाळासाहेब बोबडे, लक्ष्मण बिराजदार, नागेश नाईकवाडे, रमेश भंगे, राजकुमार बिराजदार, सुनीता चव्हाण, प्रियांको दोंडाळे आदी यामध्ये सहभागी झाले होते.
सोलापूर जिल्ह्यात २०२२-२०२३ या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची एकूण एफआरपी ४ हजार ९० कोटी रुपयांपर्यंत आहे. साखर कारखानदारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ३ हजार ५१२ कोटी रुपये दिले आहेत.
साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे अजूनही ५७७ कोटी रुपये थकित आहेत. साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांना या वेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.