Sangli Shaktipeeth Highway : सांगली जिल्ह्यातील ‘शक्तिपीठ’साठी १८ गावांत क्षेत्र मोजणी रस्ते विकास महामंडळाने दिले आदेश

Goa Nagpur Highway : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तिपीठ महामार्ग करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Shaktipeeth Highway Sangli Farmers : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत क्षेत्र मोजणीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश आहे. रस्ते विकास महामंडळाने बुधवार (ता.१५) ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या. सांगली जिल्ह्यात जमिनीच्या १ हजार ३४० गटांमधून हा महामार्ग जाणार असून, सुमारे ५९६ हेक्टर क्षेत्र अधिगृहित केले जाणार आहे.

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तिपीठ महामार्ग करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तूर्त सांगली जिल्ह्यापर्यंत हा महामार्ग करण्याचे धोरण अवलंबले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले असले तरी पुढे सिंधुदुर्गमधील शेतजमीन अधिग्रहण केली जाणार आहे. त्यासंदर्भातही क्षेत्र मोजणीचे आदेश दिले आहेत.

Shaktipeeth Highway
Sangli Grape Market : सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची निर्यात घटणार, नैसर्गिक आपत्तीचा फटका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत कामाचे आदेश दिले होते. महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढील 2 महिन्यांत महामार्गासाठी नियोजित जागेची मोजणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये शेती क्षेत्र, पिके, झाडे या सर्वांची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी एजन्सी नेमल्या जातील.

मोबदला हा वादाचा विषय

शक्तिपीठ महामार्गाला विविध पातळ्यांवर विरोध सुरू आहे. त्यात प्रामुख्याने शेतजमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याचा वाद मुख्य आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडिरेकनरच्या चारपट मोबदला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काही जाणकारांनी रत्नागिरी ते नागपूर राष्‍ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा महामार्ग अनावश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. हा सर्व विरोध डावलून सरकारने आता भूमापनाचे आदेश दिले आहेत.

‘या’ गावांचा समावेश

आटपाडी तालुका : शेटफळे, कवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुका : डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, वज्रचौंडी, मणेराजुरी, गवाण, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com