
Akola News : यंदा फेब्रुवारीत दिवसा तीव्र उष्णता आणि रात्री थंडीचा जोर, अशा विचित्र वातावरणाने उन्हाळी पिके, फळबागांना जसा फटका बसतो आहे, तसाच त्रास नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. गावागावात सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण असून दवाखाने तुडूंब भरलेली दिसून येतात. विशेषतः लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे.
यंदा फेब्रुवारी सुरू होताच तापमान वाढीला सुरुवात झाली. मागील काही दिवसांत दिवसाचे तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान १५ ते १९ दरम्यान राहत आहे.
या तापमानाचा विपरीत परिणाम पिकांवर अधिक दिसून येत आहेत. या भागात कलिंगड, खरबूज लागवड अधिक झालेली आहे. या पिकांना सर्वाधिक फटका बसला.
आधीच कीड, रोगांचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यात तापमान वाढीचा ताण बसतो आहे. पिकाला उष्णता-थंडीचे वातावरण मानवलेले नाही. अचानक कलिंगडाचे वेल वाळून जात आहेत. या पिकासाठी एकरी लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. हा लागवडीचा पैसाही अनेकांचा निघालेला नाही. उशिराने लागवड झालेल्या हरभरा पिकाची अवस्था अशीच होती. हरभऱ्याचे उत्पादन एकरी चार ते सहा क्विंटल दरम्यान बहुसंख्य शेतकऱ्यांना झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.