Dam Water Storage : गिरणा, हतनूर, पांझरा, वाघूरमधून विसर्ग

Dam Water Discharge : तापी नदीवरील खानदेशातील सर्वच प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. त्यात भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून सुमारे दीड महिन्यापासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात गिरणा धरणासह वाघूर, हतनूर व पांझरा आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा धरणाचे दरवाजे अलीकडे बंद केले होते. पण धरणात पाण्याची आवक वाढल्याने त्याचे दरवाजे पुन्हा मंगळवारी (ता. २४) उघडण्यात आले.

तापी नदीवरील खानदेशातील सर्वच प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. त्यात भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून सुमारे दीड महिन्यापासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मध्यंतरी धरणाचे १८ दरवाजे उघडे होते.

या धरणातून जलसाठा नियंत्रणासाठी विसर्ग केला जात आहे. जामनेरातील वाघूर धरणही १०० टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गिरणा नदीवरील नांदगाव (जि. नाशिक) नजीकच्या गिरणा धरणातूनही मागील १५ ते १६ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे धरण १०० टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू झाला. पण फक्त दोनच दरवाजे उघडण्यात आले होते. त्यातूनही विसर्ग कमी अधिक करण्यात आला. यातच धरणातील आवक कमी झाल्याने हे दोन दरवाजेही बंद करण्यात आले होते. ते मंगळवारी उघडण्यात आले.

Water Storage
Water Storage : लातुरातील आठपैकी दोनच मध्यम प्रकल्प भरले

त्यातून सुमारे २०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग मंगळवारी सुरू होता. गिरणा धरणातील पाण्याद्वारे एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील म्हसवे, भोकरबारी या प्रकल्पांत पाणी सोडले जात आहे. यामुळे या प्रकल्पांचे पुनर्भरण होऊन जलसाठा काहीसा वाढला आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या रावेरातील मंगरूळ, यावलमधील सुकी, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील अग्नावती, पारोळ्यातील बोरी या प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. धुळ्यातील पांझरा, शिरपुरातील अनेर, साक्रीमधील जामखेली, बुराई या प्रकल्पांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नंदुरबारातही शहाद्यातील चिरडे, सुसरी, दरा व अन्य भागात देहली प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Water Storage
Water Storage : मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांमुळे केळी पट्ट्याला यंदाही दिलासा

रब्बीबाबत अपेक्षा उंचावल्या

या महिन्यात अखेरीसही पाऊस आला आहे. यामुळे कोरडवाहू व बागायती क्षेत्रात रब्बीची पेरणी बऱ्यापैकी होईल. तसेच जळगावात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आदी प्रकल्पांतून रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेल, याची हमी दिसत आहे.

रब्बीसह अन्य बाबींसाठी पाण्याच्या आरक्षणासंबंधी पुढील महिन्यात कालवा समित्या व प्रशासन यांची बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय घेतले जातील. जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणाच्या माध्यमातून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव भागात २१ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळेल, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com