
Yavatmal News : आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नजीकच्या काळात प्रयोगशीलतेचे वारे वाहत आहेत. यातूनच रेशीम, भुईमूग तीळ, मूग, ज्वारी अशा पिकांच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहे. याच श्रृंखलेत फुलसावंगी परिसरातील चिल्ली गावच्या एका शेतकऱ्याने रक्त चंदनाच्या शेतीचा प्रयोग केला आहे.
सिंचनाचा अभाव, त्यातून पारंपरिक पिकाची सातत्याने कमी होणारी उत्पादकता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या सर्व कारणांमुळे नैराश्य वाढते आहे. यातूनच यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. या परिसरात सध्या ऊस, कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी, तीळ, केळी असे पारंपरिक पिके शेतात घेतली जातात.
परंतु चिल्ली (ईजारा) येथील एका कल्पक शेतकऱ्याने या पारंपरिक पिकांना जोपासत एक नवीन प्रयोग केला, तो म्हणजे ‘रक्त चंदनाची‘ शेती. कपिल चंद्रिकाप्रसाद पांडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते सध्या बेंगलोर येथे नोकरीनिमित्त राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेती चिल्ली (ई) येथे असून त्यांनी जुलै २०१८ मध्ये दीड एकर शेतीमध्ये रक्त चंदनाची सहाशे रोपे दहा बाय दहाच्या अंतरावर लावली.
सुरुवातीच्या काळात रोपे लहान असल्याने तीन वर्षे त्यामध्ये आंतरपीक सुद्धा घेतले. त्यांचा रोपांचा खर्च एक लाख रुपये तर ‘ठिबक’चा खर्च एक लाख व वार्षिक व्यवस्थापन खर्च वीस हजार रुपये एवढा आहे. हे रक्त चंदनाचे झाड परिपक्व होण्यास १५ वर्षांचा कालावधी लागतो.
या मौल्यवान अशा रक्त चंदनापासून कॉस्मेटिक तसेच वन औषधी व मौल्यवान वाद्य बनतात. भारतातील रक्त चंदन अत्यंत दर्जेदार असल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील रक्त चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर या रक्त चंदनाच्या एका झाडाची किंमत ८० हजार रुपये ते एक लाख रुपये असू शकते, असे कपिल पांडे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.