Raju Shetti : ऊस दराचा तोडगा अद्यापही नाही, ८ तासांहून अधिक महामार्ग ठप्प

Sugarcane FRP : उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Raju Shetti vs Sugarcane Factory Owners : मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. दरम्यान आज सकाळी १० वाजता सुरू झालेले चक्काजाम आंदोलन अद्यापही सुरू आहे. जवळपास ८ तासांहून अधिक राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावेळी कोल्हापूर पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५०० पेक्षा अधिक पोलीस, अग्निशमनचे बंब आंदोलन स्थळी तैनात केले आहेत.

याचबरोबर नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू आहे. परंतु यावर अद्यापही योग्य तोडगा न निघाल्याने महामार्गावरील वाहतूक सुरू होण्यास किती वेळ याबाबत कोणाकडून दुजोरा देण्यात आला नाही.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मागील हंगामातील चारशे रुपये मागत होतो, आम्ही तीन पावले मागे आलो आहोत. दोनशेवरून शंभर रुपये दिले तरी चालतील; पण, ते दिलेच पाहिजेत. काही कारखाने देण्यास तयार आहेत; पण, सरकार त्यात आडकाठी आणत होते. आता हे पैसे दिले तर आयुक्त त्यांना मान्यता देतील, असे सहकारमंत्र्यांनीच सांगितल्याने कारखान्यांनी तसे जाहीर करावे असे आवाहन केले आहे.

आज सकाळपासून हजारोच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी महामार्गावर शिरोली पुलाजवळ जमू लागले. त्यामुळे परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यांशी फोनवर संवाद साधला.

पण शेट्टी आपल्या मागण्यांवर ठाम असून कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका जाहीर केली. राजू शेट्टीसह हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. दुपारी शाहू महाराज छत्रपती यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

Raju Shetti
Raju Shetti : 'गनिमी काव्याने महामार्गावर या, लुंग्या सुंग्याना थारा देऊ नका', राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

यावेळी आंदोलकांशी संवाद साधत असताना शाहू महाराज म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून राजू शेट्टी ऊस दराच्या मागणीवरून आंदोलन करत आहेत. परंतु साखर कारखाने दखल घेतली नाही. सरकारही मध्यस्थी करताना दिसत नाही.

शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर मध्यस्थी करून मार्ग काढणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तडजोड करावी, असे आवाहन शाहू महाराजांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com