Konkan Farmers Protest: नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. जवळपास ९० टक्के पीक हातातून गेले आहे. अशा परिस्थितीत गेली दोन महिने कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. असे असताना सरकारने केवळ हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. ही मदतीच्या नावाखाली केलेली क्रूर थट्टा आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. .आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रचंड असा मोर्चा मुंबईत धडकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. .ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला आहे, त्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये मिळतील. तर ज्यांना पीक संरक्षण नाही, त्यांना हेक्टरी २२ हजार मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. २६ मार्च) विधानसभेत केली. या मदतीच्या घोषणेवर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. .Konkan Farmers Protest: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रोखला मुंबई- गोवा महामार्ग.सरकारने हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर केली. फळपिकाच्या कलमाला केवळ २२० रुपये मदत मिळतील. काजू उत्पादकाला तर सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. खरं तर सरकारला याची लाज वाटली पाहिजे. सरकारकडे कुंभमेळ्यावर २५ हजार कोटी उधळण्यासाठी पैसे आहेत. तसेच त्यांना सगळ्या महाराष्ट्राला नको असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ७० हजार कोटी रुपये खायला मिळणार आहेत. ज्यासाठी १ लाख १५ हजार कोटी रुपये उधळायला यांच्याकडे पैसे आहेत. पण जो कोकणातील शेतकरी केवळ आंबा फळ आणि पल्प निर्यात करुन वर्षाला १,३०० कोटी रुपये परकीय चलन मिळवून देतो. तो पहिल्यांदाच मदतीची अपेक्षा करत होता. त्याला कलमाला २२० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्या कलमावर शेतकऱ्यांनी यावर्षी साडेचार ते पाच हजार रुपये खर्च केले आहेत; त्याला सरकार २२० रुपये मिळणार आहे. यंदा सगळे उत्पन्न पाण्यात गेले आहेत. दहा टक्केदेखील उत्पन्न हातात मिळणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले आहे..Farmer Support: आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार : मुख्यमंत्री.सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. राणे मोठ्या तोंडाने सांगत होते की सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे. हीच का शेतकऱ्यांची काळजी? असा प्रश्न शेट्टी यांनी केला. 'तुमच्या वडिलांची कारकीर्द आठवा. ते विरोधी पक्षनेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते', अशा शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला..मुंबईत कोकणातील शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणारमुख्यमंत्र्यांना याची किंमत मोजावी लागले. लवकरच एक व्यापक मेळावा घेऊन चलो मुंबईचा नारा दिला जाईल. पाच जिल्ह्यांतील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रचंड असा मोर्चा मुंबईत धडकल्याशिवाय राहणार नाही. आता आरपारची लढाई करावी लागणार आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.