Sangli Sugarcane Rate : राजू शेट्टींचा निशाण्यावर जयंत पाटील, सांगली जिल्ह्याचा ऊस दराचा मुद्दा पेटणार!

Sugarcane Rate : कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे प्रतिटन २०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी विचार करावा.
Sangli Sugarcane Rate
Sangli Sugarcane Rateagrowon
Published on
Updated on

Raju Shetti vs Jayant Patil : सांगली जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्यावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. मागच्या ४ दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याच्या दारात जात आंदोलन केले. दरम्यान यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी ७ डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास महामार्ग रोखणार असल्याची माहिती दिली. यावर आता जोरदार आरोप प्रत्यारोप होत असताना पहायला मिळत आहे. श्री शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राजारामबापू उद्योग समूहाचे नेते, आमदार जयंत पाटील ऊसदराबाबत तिरकी चाल खेळत आहेत. त्यांच्या दबावामुळे उसाला दर देताना अन्य कारखानदार मागे सरत आहेत. आमच्यावर गुन्हा दाखल करून तुमचे समाधान होणार असेल तर हरकत नाही. आम्ही तुरुंगात राहू, मात्र शेतकऱ्यांच्या उसाला दर द्या,' अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनाची धग कायम आहे. सोळा कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. चार कारखाने जयंत पाटील यांचे आहेत. मोहनराव शिंदे, विश्वास व क्रांती कारखाना त्यांच्याच इशाऱ्यावर चालतात. चार कारखाने डॉ. विश्वजित कदम यांचे आहेत.

११ कारखाने जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होऊन यंदाच्या वर्षीची पहिली उचल ३ हजार १०० रुपये देण्याचे ठरविले आहे. सहा कारखान्यांची पहिली उचल एफआरपीप्रमाणे ३ हजार २०० रुपयांहून अधिक जाते. पाच कारखान्यांची उचल एफआरपीप्रमाणे २ हजार ४५० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत आहे.

जे पाच कारखाने २ हजार ४५० पासून २ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देतात, त्यांना ३ हजार १०० रुपये प्रतिटन परवडते. मग, बाकीच्या ११ कारखान्यांना एफआरपीहुन अधिक १०० रुपये देण्यास का परवडत नाही? जयंत पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्यांना नागवले जात आहे.

Sangli Sugarcane Rate
Raju Shetti vs Jayant Patil : राजारामबापू कारखान्यावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा

राजारामबापू, सोनहिरा, क्रांती कारखान्याचा उतारा चांगला आहे. कारण शेतकऱ्यांनी १६ महिन्यांचा ऊस गाळपास दिला. त्यांना योग्य दर देताना मात्र कारखानदार साखळी करत आहेत. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे प्रतिटन २०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी विचार करावा. तुमचा १०० टन ऊस गेला असेल तर २० हजार रुपयांचे नुकसान होणार आहे.

राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून ३ हजार १०० रुपये दर मान्य आहे, असे शेतकऱ्यांकडून लिहून घेऊन एफआरपीपेक्षा कमी दर देऊ लागलेत. त्यांच्याच ताळेबंदानुसार वाढलेल्या साखर दरातील फरकानुसार कारखान्याकडून २६० रुपये प्रतिटन देणे लागते.

राजारामबापू कारखाना सांगतो, शेतकऱ्यांना ५० रुपये देणे लागतो. मग उर्वरित २१० रुपये कुणाच्या खिशात गेले? राजारामबापू कारखाना जबरदस्तीने अधिकारपत्र लिहून घेत आहे. कारखाना सचिवांमार्फत गुन्हे दाखल केले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com