
Washi News : काही महिन्यांपूर्वी शंभरी पार गेलेल्या टोमॅटोच्या भावात आता मोठी घसरण झाली आहे. वाशीच्या एपीएमसीत आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावाने तळ गाठला असून, गेल्या वर्षभरातील हा सर्वात मोठा नीचांक असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
एपीएमसी घाऊक बाजारात ९ ते १० रुपये प्रतिकिलो विकला जात असल्याने ग्राहक खूश असला तरी भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
हिवाळ्यात उत्पादन जास्त झाल्याने वाशीच्या एपीएमसी भाजीपाला बाजारात आवक वाढली आहे. बाजारात सध्या नाशिक, लातूर, नारायणगाव या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
सोमवारी (ता. २०) वाशीच्या एपीएमसी भाजीपाला बाजारात ३,२८८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. त्यामुळे भावावर परिणाम होऊन वर्षाच्या शेवटी (डिसेंबर २०२४) घाऊक भाजीपाला बाजारात १४ ते १८ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो २० जानेवारीला ९ ते १० रुपये किलोवर आला आहे; तर किरकोळ बाजारात २० रुपयांनी विक्री केली जात आहे. बाजारात टोमॅटोला उठाव मिळत नसल्याने व्यापारीही चिंतेत पडले आहेत.
शेतकरी हवालदिल
जुलैमध्ये ८० ते १०० रुपये किलो भाव मिळत होता. भरघोस पीक आल्यानंतर टोमॅटोला कोणी विचारेनासे झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.