Raj Thackeray : शेतकरी पण लाडका असल्याचे सरकारने दाखवून द्यावं; पंचनाम्यावरून राज्य ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना

Raj Thackeray On Marathawada Crop Damage : मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मागील चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Raj Thackeray On Marathawada Crop Damage
Raj Thackeray On Marathawada Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यामधील विविध भागात गेल्या चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेत जमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. कापूस, सोयाबीन, हळद, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर मूग, उडीद पिकंही हातची गेल्यात जमा आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. याबाबत बुधवारी (ता.४) त्यांनी, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. मराठवाड्यातील शेतकरी सरकारसाठी लाडका असल्याचे दाखवून द्यावे, असे म्हटले आहे. तसेच नुकसानीच्या पंचनाम्यावरून मनसैनिकांना सूचना केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करताना, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं डोळ्यासमोर नष्ट झाली आहेत. ते देखील सणासुदीच्या तोंडावर. जे शेतकऱ्यांसाठी सहन करणं कठीण आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. तर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे. मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा लाडका, असल्याचे सरकारने दाखवून द्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray On Marathawada Crop Damage
Marathwada Crop Damage: राज्यात पावसाने पिकांची दाणादाण; पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश

यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सूचना करताना, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होतात की याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे झटपट होत नसतील तर अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लावावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची दखल घ्यावी, असे मनसैनिकांना आदेश दिले आहेत.

Raj Thackeray On Marathawada Crop Damage
Crop Damage Survey : ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करावेत’

गेल्या चार दिवसापासून पडलेल्या पावसामुळे जमीन ओली झालेली असून ती सुकायला वेळ लागते. यामुळे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे, अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स पोहचतील ते पाहावं. किमान यानिमित्ताने पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल!, असाही टोला राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना लगावला आहे.

तसेच सरकारने मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरीही सध्याच्या स्थितीत पाहता प्रशासनाला कामाला लावून पंचनामे लवकर करावेत. जेणेकरून गणपतीच्या सणाच्या काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशा सूचना राज ठाकरे यांनी सरकारला केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com