
Pune News: पुणे जिल्ह्यात सर्व प्रकारची मोठ्या प्रमाणात पर्यटनाची स्थळे अधिक आहे. त्याला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये कृषी पर्यटन परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये खासगी विविध गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून शासन व गुंतवणूकदार एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पर्यटन केंद्रे विकसित केले जातील. त्यामुळे पुणे जिल्हा हा पर्यटनाचे हब म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने बुधवारी (ता. ९) आयोजित केलेल्या वार्तालाप प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे, सचिव मिनाक्षी गुरव आदी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले की, प्रशासनाने पर्यटन केंद्राचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी पर्यटन केंद्राच्या जागांची निवड केली जाणार असून तेथील स्थळांना प्रसिद्धी, तेथील मालाचे ब्रॅडिग, मार्केटिंगसाठी मदत केली जाईल. परदेशातील अनेक देश पर्यटन केंद्रे म्हणून विकसित झाले आहेत. त्याप्रमाणे पुणे हे सुद्धा पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी काम केले जाईल. तेथे आवश्यक त्या पूर्वपरवानग्या, सर्व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी नियमावली देण्यात येईल.
महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना महसूलमधील चांगली माहिती मीडियाला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सध्या जिल्ह्यासाठी काही प्रकल्प हाती घेतले आहे. पुण्यामध्ये कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. कारण संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे, प्रगतशील शेतकरी, कृषी यंत्रणा आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास शेतीला व्यावसायिक रूप देऊ शकतो. देशात ज्या-ज्या ठिकाणी चांगले काम झाले आहे. त्याचा अभ्यास केला आहे.
त्यावर आधारित पुण्यातील पिकांचा पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पिकांचे क्लस्टर तयार केले आहे. यामध्ये केळी, आंबा, अंजीर, स्ट्रॉबेरी, मका, सूर्यफूल अशा पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये काही फार्मर प्रोड्यूसर कंपन्या काम करत आहे. त्या निर्यातीच्या दृष्टीने काम करत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम केले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांची निवड केली आहे.
जिल्ह्यात ‘सह्याद्री’ सारख्या दहा शेतकरी कंपन्या तयार करण्यासाठी काम हाती घेतले आहे. यामध्ये कमी पाण्यामध्ये अधिक चांगले उत्पन्न घेण्यासाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात पहिली अॅग्री हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आधारलेल्या तंत्राला पहिले बक्षिस २५ लाख रुपयांचे देणार आहे. त्याची सुरुवात खरीप हंगामात केली जाणार आहे. हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने वापरल्यास ग्रामीण भागात चांगली अर्थव्यवस्था उंचावण्यास मदत होईल.
फाईल निकाली निघण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
नागरिकांच्या तक्रारीच्या फाइल लवकर निकाली निघण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे कोणती फाईल कधी आली आहे, किती दिवसांपासून फाईल पेंडिंग आहे, हे समजणार असून त्यावर लवकर काम करण्यासाठी आदेश दिले आहे. त्यावर सर्वजण काम करत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.