
Solapur News : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे गेल्या आठवडाभरापासून विजेची मागणी वाढली असून, वेळेवर वीज नसल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे. बीबीदारफळ वीज उपकेंद्रात अंतर्गत रानमसले येथे वीज पुरवठा होतो, रानमसले शिवारात गेल्या आठवड्यामध्ये दर दहा मिनिटाला वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.
सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शिरापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिकांना कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला पिकांना पाणी देण्याची धडपड सुरू आहे. मात्र कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांचे पिके पाण्यावाचून जळू लागले आहेत.
अशीच परिस्थिती नान्नज उपकेंद्रांतर्गत अवस्था असून, यामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीबीदारफळ उपकेंद्राची वीज पुरवठा करण्याची क्षमता पाच एमव्हीए इतकी असून, या अंतर्गत बीबीदारफळ शिवारातील ५० तर रानमसले शिवारातील ८४ असे एकूण १३४ डीपी सुरू आहेत. यातील बहुतांश डीपी हे १०० केवी क्षमतेचे आहेत.
जसजसा उन्हाळा सुरू होत आहे तसतसे विजेची मागणी वाढत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे आठ तासाऐवजी काही गावांमध्ये चार-चार तासाची शिफ्ट चालू केली आहे. यामुळे कॅनॉलला पाणी असूनही शेतकऱ्यांना घेता येत नाही तसेच विहिरीत पाणी असूनही पिकांना देता येत नाही अशी अवस्था झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.