
Kopargaon News : रब्बी पिकांसह कांदा, फळबागा पाण्यावर आलेल्या असताना कृषी पंपांना रोटेशनने दिवसा मिळणारी वीज सतत खंडित होत असल्याने तालुक्यातील मळेगाव थडी आणि रवंदा परिसरांतील शेतकरी प्रचंड त्रासले आहेत.
वाढीव लोडसह नवा पॉवर ट्रान्स्फॉरमरही मंजूर करून तीन वर्षे झाली, तरी तो न बदलण्यात आल्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना पिकांच्या माध्यमातून बसत असल्याने ते संतप्त झाले आहेत.
सध्या रब्बी गहू, ज्वारी, मका आदी पिके पाण्यावर आली आहेत. ओंबी, कणसे चिकात येत आहेत. उशिराच्या पावसामुळे खोळंबलेल्या कांदा लागवडी जोरात सुरू आहेत. आधीच मजूरटंचाईमुळे लागवडी लांबल्याने कृषिपंपांना दिवसा पुरेशी वीज मिळत नाही. १०-१५ मिनिटांत कृषिपंप सतत बंद पडत असल्याने शेतकरी प्रचंड त्रासले आहेत.
याप्रश्नी शेतकऱ्यांनी रवंदे सब स्टेशनला धडक देऊन तक्रारी केल्या. मात्र ‘आमच्या हातात काही नाही, लोड भरपूर आहे आणि ट्रान्समीटरची क्षमता कमी आहे, तुम्ही वरिष्ठांना भेटा,’ अशी उत्तरे मिळतात. वरिष्ठांकडे चौकशी केल्यास, ते संगमनेरकडे चौकशी करा सांगतात, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
तीन वर्षांपासून मंजुरी !
पाण्याची उपलब्धतेमुळे यंदा बागायती पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. अशातच विजेची मागणीतही वाढ झाली आहे. सध्या रवंदा सबस्टेशनला ३.१५ एमव्हीएचा पावर ट्रान्स्फॉरमर आहे,
लोड वाढताच त्याची क्षमता कमी पडते. यामुळे तीन वर्षांपूर्वी लोडसह ५ एमव्हीएचा पावर ट्रान्स्फॉरमर मंजूर करण्यात आला आहे. मात्र तो अद्यापही बदलण्यात न आल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.