Poverty-Free Village : गरिबीमुक्त गाव करण्यासाठी नियोजन

Rural Development : गाव पाणीदार झाल्याने सिंचनाच्या क्षमता वाढतात, त्याच प्रमाणे रोजगाराच्या संधी देखील वाढतात. दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर पूरक आणि शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या व्यवसायासाठी संधी वाढतात. यासाठी ग्राम दारिद्र्यनिर्मूलन आराखडा आणि ग्रामपंचायत विकास आराखडा यांची सांगड घालणे गरजेचे आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Employment Generation For Poverty-Free Village : वातावरण बदलाच्या परिणामामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होते आहे. आणि मागील काही वर्षांपासून हवामान बदलाचा प्रभाव आहे. त्याचा परिणाम थेट लोकजीवन, शेतीवर होत आहे. तीव्रतेची गरिबी, अनारोग्यामुळे अराजक परिस्थिती काही देशात निर्माण झाली आहे.

वातावरण बदलाच्या परिणाम आणि गरिबी हे घटक एकमेकांची पूरक आहेत. हवामान बदलाच्या परिणामामुळे दुष्काळ आणि पूर यांची वारंवारता वाढते आहे; त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम संभवतात, हे आपण पाहत आहोतच. गरिबी समूळ कमी करावयाची असेल तर ग्रामपंचायत या पाणीदार होणे अपरिहार्य ठरते.

ज्या ग्रामपंचायतींनी गाव पाणीदार करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, त्या पंचायतींची वाटचाल गरिबीमुक्त वेगाने होत आहे. सिन्नर तालुक्यातील कोनांबे, दिंडोरी तालुक्यातील इंदोरे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल या अलीकडच्या काळातील ग्रामपंचायतीची उदाहरणे देता येतील. या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक गाव पाणीदार करण्याच्या उद्देशाने कार्यरत झाले आहेत.

सरपंच अथवा गावातील युवकांनी गाव पाणीदार करण्याची प्रेरणा काही दिशादर्शक यशस्वी गावातून उचलल्याचे दिसते. हिवरेबाजार, जालना जिल्ह्यातील कडवंची, सोलापूर जिल्ह्यातील कासाळगंगा खोऱ्यातील काही गावे दिशादर्शक आहेत. जलयुक्त शिवार योजनेचे शास्त्रीय नियोजन आणि अंमलबजावणी करणारी गावे त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनाच्या मार्फत देखील अनेक गावांचा कायापालट झाल्याचे दिसते. नाम फाउंडेशनच्या सहकार्याने देखील अनेक गावे पाणीदार झाल्याचे उदाहरणे आहेत.

Rural Development
Rural Development : शाश्‍वत विकासध्येयामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका

गरिबीमुक्त गाव करण्याचे नियोजन

गाव गरिबीमुक्त करण्यासाठी शाश्‍वत विकासाच्या नऊ संकल्पना या अत्यंत दिशादर्शक आहेत. गाव पाणीदार करण्यासाठी गावातील सूक्ष्म पाणलोटाचा अभ्यास, लोकसहभागाद्वारे शिवारफेरीचे नियोजन आणि त्यानुसार कामाची शास्त्रीय आखणी, त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्याची रचना या काही पायऱ्या आहेत.

त्याचप्रमाणे गावातील गरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना महिला स्वयंसहाय्यता गटात सामावून घेऊन त्यांना बचत आणि कर्ज परतफेडीची सवय अंगीकार करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.

गरजेच्यावेळी महिलांना पुरेसे अर्थ साहाय्य महत्त्वाचे ठरते. गाव पाणीदार झाल्याने सिंचनाच्या क्षमता वाढतात, त्याच प्रमाणे रोजगाराच्या संधी देखील वाढतात. दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर पूरक आणि शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या व्यवसायासाठी संधी वाढतात. यासाठी ग्राम दारिद्र्यनिर्मूलन आराखडा आणि ग्रामपंचायत विकास आराखडा यांची सांगड घालावी.

स्वयंसाह्यता गटात १०० टक्के महिला असतात. ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के महिला सदस्य असतात. सामाजिक वर्गवारीनुसार आरक्षण ठरते. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांत देखील महिला आरक्षण आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे. म्हणजेच गरिबीमुक्त पंचायतीचा आराखडा तयार करण्याच्या टप्प्यात महिलांची प्रभावी भूमिका आहे.

त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या मार्फत गरिबी निर्मूलनाच्या स्तरावर देखील महिलाच आहेत. थोडक्यात, नियोजन आणि अंमलबजावणी स्तरावर निर्णयाच्या वेळी महिला प्रभावी असतात. म्हणून गावाचा गरिबी निर्मूलन आराखड्याचा समावेश ग्रामपंचायत आराखड्यात करण्याचा आग्रह महिलांनी धरावा. एकदा का त्याचा समावेश झाला की पुढील अंमलबजावणीच्या बाबी सुकर होतात.

Rural Development
Rural Development: ग्रामविकासासाठी सहकार, पंचायती, बचत गटांची मोट बांधणार

हिवरेबाजार गावाने काय शिकवले?

हिवरेबाजारमध्ये किती पाऊस पडला, तर किती कालावधीची पाण्याची तजवीज होऊ शकते? हे गावातील प्रत्येकास माहिती आहे. गावातील तीन सूक्ष्म पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापक बसवलेले आहेत. तेथील पाऊस शाळेतील मुले मोजतात आणि गावामध्ये पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. ग्रामसभेत पीक आणि पाण्याचे गणित मांडून कोणती पिके घ्यायची नाहीत ते ठरविले जाते. हेच शहाणपण प्रत्येक गावासाठी अनुकरणीय आहे.

जागतिक स्तरावरील बदलाच्या नांदीत २०३० पर्यंत देशातील सर्वच क्षेत्रातील विकासात ध्येयांची निश्‍चिती आणि दिशा शाश्‍वत विकासाच्या ध्येयांनी निश्‍चित केलेली आहे. जग एक कुटुंब आहे हा व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्वांच्या कल्याणासाठी सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि पर्यावरणीय बाबींचा साकल्याने विचार केला जातो.

शाश्‍वत विकासासाठी चळवळ

शाश्‍वत विकासाच्या लक्षांची पूर्तता करण्यासाठी वैश्‍विक, स्थानिक आणि व्यक्ती स्तरावर कृती होणे आवश्यक ठरते. वैश्‍विक स्तरावर राष्ट्रीय पातळीवर आवश्यकतेनुसार नियोजन आणि कृती होणे गरजेचे आहे. स्थानिक स्तरावर म्हणजेच धोरण, कायद्यामध्ये सुसंगत बदल, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे, अंमलबजावणीसाठी आणि नियमनासाठी उत्तरदायी चौकट आणि यंत्रणा तसेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या तरतुदी करणे या बाबी समाविष्ट असतील.

व्यक्ती स्तरावर म्हणजेच महिला, युवक, सामाजिक संस्था, खासगी क्षेत्र, समाज माध्यम, पत्रकार, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय या सर्वांची मिळून अथक चळवळ उभी राहणे आवश्यक ठरते.

पंचायतीच्यामार्फत पाच वर्षांच्या नियोजनाचा समावेश असलेला यथार्थ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येतो, त्याचप्रमाणे प्राधान्यानुसार वार्षिक आराखडा देखील करण्यात येतो. ग्रामपंचायतीच्या कार्य क्षेत्रात कोणीही गरीब अथवा वंचित राहू नये यासाठी ग्राम पंचायती सोबत महिला स्वयंसाह्यता गट देखील तेवढ्याच क्षमतेने कार्य करत आहेत.

गरिबीमुक्त गाव हे ध्येय व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. गरीब आणि वंचित कुटुंबांच्या उन्नती मध्ये पंचायतीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये समाविष्ट कामे आणि त्यासाठी असलेली तरतूद ही बांधकामे, मूलभूत सुविधा यांच्याकडे असल्याचे जाणवते.

पूर आणि दुष्काळासाठी नियोजन, गावातील जलस्रोत अबाधित, अतिक्रमणापासून दूर आणि बळकट करण्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. व्यक्तिगत स्वार्थ आणि महत्वाकांक्षा यांच्या पलीकडे जाऊन याचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या आसपास अनेक शहाणी गावे नक्कीच आढळतील, त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार आपल्या गावात नियोजन करणे सहज शक्य आहे.

सूक्ष्म सिंचन आणि शाश्‍वत पाणीदार गाव

जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनांची यशस्वी अंमलबजावणी तसेच पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन यासारख्या संस्थांच्या सहकार्याने विविध गावांत काम झाले आहे. पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान असल्याने त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसते. गाव पाणीदार झाल्याचे चित्र निर्माण झाले.

तथापि, काही गावात जल संधारणाचे योग्य नियोजन नसल्याने पुन्हा टंचाई निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. अधिक पाणी लागणाऱ्या पीक क्षेत्रात वाढ आणि पाण्याच्या योग्य वापराचे सूत्र हरवल्याने पाणीदार गावे पुन्हा टंचाईत लोटली जातात.

पाण्याचा ताळेबंद, जलचक्र आणि पीक चक्र यात समन्वय नसणे ही काही प्रमुख कारणे आहेत. पाणीदार झालेले गाव पाणीदार राहण्यासाठी गावाने किमान दोन ऋतू चक्रात पुरेसे पाणी असावे, असे नियोजन करणे आवश्यक आहे.

९७६४००६६८३

(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com