Akola News : या भागात सततचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय आता सोयाबीन काढणीला तयार होत असताना पाऊस येत असल्याने हा हंगाम लांबण्याची शक्यता वाढली आहे. कपाशी पिकाचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी यंदा कमालीचा चिंतातूर आहे.
या भागात जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी व तुरीच्या पिकावर कीडरोगांचे आक्रमण झाले. तसेच सतत पाऊस, कधी धुके पडल्याने नुकसान अधिक होऊ लागले. अशा वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. शिवाय आता पिके पिवळी पडत असून सोयाबीन पाठोपाठ कपाशी व तुरीच्या उत्पादनात मोठ्या घटीची शक्यता वाढली आहे.
उमरा मंडलात या वर्षी खरीप हंगामात उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी अल्प प्रमाणात झाली असून सोयाबीन, तूर, कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात टप्प्याटप्प्याने सतत पाऊस सुरू असून पोळ्यादरम्यान झालेल्या अतिपावसामुळे सोयाबीन पिकाच्या ऐन फळधारणेच्या अवस्थेत नुकसान झाले.
पीक पिवळे पडले. त्यासोबत सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून वेगवेगळ्या अळ्यांचे यावर आक्रमण झाले. कपाशीची पण हीच अवस्था असून या पिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव होता. फुलपात्यांची गळती झाली. बोंडे परिपक्व होण्यास अडथळे आले. आता जी बोंडे लागली त्यातून कवडीयुक्त कापूस उमलत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.