

Palghar News : तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी (ता. २६) काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार, तर काही भागात तुरळक सरी कोसळल्या. सद्यःस्थितीत खरीप पिकाच्या कापणीनंतर ते खळ्यावर आणून झोडणीचा हंगाम सुरू आहे. त्यातच मॉन्सूनोत्तर पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मोखाड्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. खरीप हंगामातील पिकाची कापणी झाल्यावर ते खळ्यावर आणणे, उडवे रचणे, तसेच झोडणी, मळणीचा हंगाम सुरू आहे.
त्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. अशातच अचानक अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे खळ्यावर, शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवण्यासाठी मोखाडा तालुक्यातील शेतकरी धावपळ करताना दिसत होते.
फळ उत्पादन घटण्याची शक्यता
बदलत्या वातावरणाचा आणि अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू फळबागांवर मोठा परिणाम होणार असल्याने तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत. यावर्षी पीक घटणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
मिरा-भाईंदरमध्ये विजांचा कडकडाट
भाईंदर (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये पहाटे पाचच्या सुमारास पाऊस झाला. या वेळी मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडाट, तसेच विजा चमकत होत्या. सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.