
Jalgaon News : खानदेशात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी व कर्जमाफ केव्हा होईल, याची प्रतीक्षा आहे. शासनातील मंडळीने फक्त मतांसाठी घोषणाबाजी केल्याचा आरोपही आता केला जात आहे.
आघाडी सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचाही अनेकांना लाभ मिळालेला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड झालेली माहिती ग्राह्य न धरली गेल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.
अशात नव्या सरकारच्या कर्जमाफी योजनेचीही प्रतीक्षा आहे. खानदेशात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना या योजनेची प्रतीक्षा आहे. या योजनेची कार्यवाही सुरू नाही. निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारणे सांगितली जातात. मग आश्वासने का देतात, असा प्रश्न आता शेतकरी करीत आहेत.
बँका कर्जवसुली करीत आहेत. कर्जमाफीचे आदेश आमच्याकडे नाहीत, असे बँकांचे म्हणणे आहे. आमच्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही, असे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. तसेच सुमारे ५० हजारांवर नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.
कर्जमाफीची यादीच बँकांत नाही. शासन प्रतिसाद देत नाही, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बी हंगाम शेतात आहे. त्यात नैसर्गिक समस्या आहेत. निधी रोज लागतो. शेतीमालास दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
कापूस, सोयाबीनला दर नाहीत. खरिपात उडीद, मुगास दर मिळाले नाहीत. तोटा शेतकरी सहन करीत आहेत. हा तोटा शासन भरून काढत नाही. आता तूर हाती आली पण तुरीसही दर नाहीत. यामुळे शेतकरी वित्तीय अडचणीत आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.