
Nashik News : ‘देशातील सर्वांत युवा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. त्यामुळे आपल्याला अनेक संधी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने पुढील ३० वर्षांच्या औद्योगिक विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली पाहिजे. तसेच कौशल्य विकासाला महत्त्व दिले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी (ता. २०) केले.
उद्योग विभागाच्या वतीने उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न, सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना उद्योगमित्र, गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी आणि ‘सह्याद्री ॲग्रो फार्म’च्या विलास शिंदे यांना ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, शनिवारी (ता.१९) मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी उद्योगपती रतन टाटा यांना निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला.
रविवारी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे अन्य पुरस्कारांचे वितरण झाले. राज्यपाल बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.