
Crop Insurance Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या (२०२२) खरीप हंगामातील पीककापणी प्रयोगावर आधारित पीकविमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडून विलंब लावला जात आहे.
त्यामुळे विमा कंपनीस तत्काळ विमा परतावा जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
खरीप हंगाम २०२२ मध्ये पीककापणी प्रयोगाआधारे पीक उत्पादनात घट आल्याचे आढळून आलेल्या मंडलातील शेतकऱ्यांना आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडून फेब्रुवारी महिन्यातच पीकविमा परतावा अदा करणे अपेक्षित होते.
परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी सतत संपर्क केला असता ४ ते ५ दिवसांत रक्कम जमा होईल, असे सांगितले जात आहे.
परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली दिसत नाही. त्यामुळे आयसीआयसीआय विमा कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना १२ टक्के विलंब व्याजासह विमापरतावा येत्या २ दिवसांत द्यावा. अन्यथा, कंपनीवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी केली.
जिल्हा सरचिटणीस प्रमोद वाकोडकर, माधव चव्हाण, रामेश्वर सोळंके यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांच्याकडे केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.