Crop Damage : कांदा रोपवाटिकांना पावसाचा फटका

Rain Update : खानदेशात मागील २० ते २५ दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसंबंधी रोपवाटिका तयार केल्या. परंतु अतिजोरदार पावसाने अनेकांच्या कांदा रोपवाटिकांची हानी झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मागील २० ते २५ दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसंबंधी रोपवाटिका तयार केल्या. परंतु अतिजोरदार पावसाने अनेकांच्या कांदा रोपवाटिकांची हानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, पारोळा, यावल, एरंडोल या भागात अतिपाऊस या आठवड्यात झाला आहे. चोपड्यातील अडावद, धानोरा परिसर कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. या भागात पावसाने कांदा रोपवाटिकांची मोठी हानी झाली आहे. धुळे जिल्ह्यातही काहीशी हानी झाली आहे. साक्री तालुक्यात अधिकचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Issue : नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्या : प्रतापराव जाधव

नंदुरबारात नवापूर व शहादा तालुक्यातील कांदा रोपवाटिकांना अतिपावसाने झोडपले आहे. खानदेशात खरिपात कांदा लागवड यंदा वाढेल, असा अंदाज आहे. कारण कांदा दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. दरातही वाढ होत आहे. पुढेही कांद्यास चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कांदा लागवडीसंबंधी अनेकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कांदा रोपवाटिका तयार केल्या. खानदेशात सुमारे २३० हेक्टरवर कांदा रोपवाटिका आहेत. सर्वाधिक कांदा लागवड धुळ्यात होईल. यंदा सुमारे साडेपाच ते सहा हजार हेक्टरवर कांदा लागवड धुळ्यात अपेक्षित आहे. तर जळगाव जिल्ह्यातही सुमारे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर खरिपातील कांदा असणार आहे.

Crop Damage
Crop Damage : एप्रिल, मेमध्ये अवकाळीने सांगलीत ३६६ हेक्टरवर नुकसान

नंदुरबारातही एक ते दीड हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. अनेकांनी आपापल्या रोपवाटिका तयार केल्या आहेत. कारण कांदा रोपांचे दर वाढतात, यामुळे खर्च वाढतो. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी कांदा रोपवाटिका तयार केल्या असून, त्यात ठिबक, मिनी तुषार सिंचनाची व्यवस्थाही केली आहे.

रोपवाटिकेत २५ ते ३० टक्के नुकसान

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर या भागात कांदा पीक अधिक असते. परंतु जूनमध्येही कमी अधिक पावसाने कांदा रोपवाटिकांना फटका बसला होता. तर या महिन्यातही या आठवड्यातील अतिपावसाने कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे.

हे नुकसान सध्या २५ ते ३० टक्के एवढे आहे. यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवड कमी करावी लागेल किंवा अन्य भागातून रोपे आणावी लागतील. कांदा रोपवाटिका धुळ्यातील धुळे, साक्री भागात अधिक आहेत. यंदा रोपवाटिकांचे नुकसान होत असल्याने नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही कांदा रोपे आणावी लागतील, अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com