Dhananjay Munde On Onion Scam : कृषिमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य; नाशकात शेतकऱ्यांचा संताप, राजीनाम्याची मागावी 

Dhananjay Munde : राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यासह कांदा व्यापारी केंद्र सरकराच्या चुकिच्या धोरणामुळे पिचला आहे. त्यातच आता कांदा घोटाळा उघड झाल्याने कांदा शेतकरी चांगलाच संतापला आहे. 
Dhananjay Munde On Onion Scam
Dhananjay Munde On Onion ScamAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी केंद्र सरकारच्या धोरणामुळे संकटात आला आहे. कांदा खरेदीत नाफेडकडून घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. त्यावरून राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या घोटाळ्यावरून शेतकऱ्यांना बेजबाबदार सल्ला दिला आहे. त्यावरून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून संताप व्यक्त केला जात आहे. तर कृषीमंत्र्यांनी त्यांच्या बेजबाबदार वक्तव्य मागे घेत शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.३) केली आहे. 

नाफेडच्या माध्यमातून राज्यातील कांदा खरेदी केला जात होता. मात्र त्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. तर नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी यांनी नाशिकच्या विविध कांदा खरेदी केंद्रांवर नियमबाह्य पद्धतीने कामकाज होत असल्याचे म्हटले होते. तसेच येथील भ्रष्टाचाराला दुजोरा दिला होता. 

Dhananjay Munde On Onion Scam
Dhananjay Munde: पीक विम्यासाठी काही शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये घेतल्याचे प्रकार उघडकीस

यानंतर राज्यात खळबळ उडाली. तर कांदा खरेदीमधील घोटाळ्यावरुन शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला. तसेच या घोटाळ्यावरून शेतकऱ्यांनी जोरदार टीका केली. यावरून  'कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जा', असा गजब सल्ला मुंडे यांनी दिला. मुंडे यांच्या या सल्ल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला असून नाशकात शेतकऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच जर राज्याचे जबाबदार कृषिमंत्रीच जर अशी भाषा करत असतील तर ही खेदाची बाब असल्याचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे. 

Dhananjay Munde On Onion Scam
Dhananjay Munde : बियाणे आणि खतांच्या तुटवड्यावर कृषीमंत्र्यांचे वक्तव्य; नफेखोरांविरोधात कारवाईचे निर्देश

एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आमचं सरकार शेतकऱ्यांचे आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमध्ये शेतकऱ्यांची अशी लूट होत आहे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याऐवजी कोर्टात जा असा सल्ला कृषिमंत्री देत आहेत. कृषिमंत्र्यांनी असा सल्ला देणं दुर्दैवी आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांत प्रचंड संतापाची भावना असून आपण याचा निषेध करत असल्याचेही दिघोळे यांनी सांगितले.  

तसेच कृषीमंत्री स्वतः एक शेतकरी असताना त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना शेतकऱ्यांबाबत किती आस्था आहे हेच आता समोर आल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. तसेच त्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्याची बाजू मांडणारा एकही पक्ष नाही, एकही नेता नाही, असे म्हणत मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत केंद्रीय पथकाकडून कांदा खरेदी विक्री व्यवहार तपासणी सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com