
Ahilyanagar News : यंदाच्या हंगामात ऊस घालूनही केदारेश्वर साखर कारखान्याकडूनच शेतकऱ्यांना उसाची थकबाकी दिली जात नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी (ता. ५) शेवगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस घेतला. ७ ते ८ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर ही शेतकऱ्यांना संबंधित उसाचे पैसे दिले नाही. या बाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार कारखाना प्रशासन, तहसीलदार, साखर आयुक्तांना भेटून पाठपुरावा केला.
मात्र आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये धरणे आंदोलन सुरू केले. मात्र या संदर्भात कोणाकडूनही दाद मिळत नसल्याने आंदोलकर्त्यांचा संताप अनावर झाला.
त्यांनी तहसील कार्यालयासमोरील शेवगाव - नगर रस्त्यावर ठाण मांडत रस्ता अडवून धरला. यावेळी कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आठ महिने उलटूनही पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा पाढा वाचताना अक्षरश: रडू कोसळले. कारखाना प्रशासनाच्या विरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, माऊली मुळे, चंद्रकांत झारगड, बाळासाहेब फटांगडे, अशोक भोसले, मच्छिंद्र आर्ले, अमोल देवढे, नाना कातकडे, अंबादास भागवत, मच्छिंद्र डाके यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.